शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तर भारत-पाक देश आनंदात राहू शकले असते! परराष्ट्रखात्याचे माजी सचिव ज्ञानेश्वर मुळे यांची खंत

By श्रीकिशन काळे | Updated: October 19, 2023 15:29 IST

आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाली, आता आपण धर्म-जातीच्या पलीकडे जायला हवं

पुणे:‘‘ मी जगभर फिरलो. अनेक देशात राहिलो. सर्वत्र खूप छान अनुभव आले. पण कुठेही गेलो तरी आपला शेजारी मात्र बदलता येत नाही. हे सत्य आहे. आपल्या शेजारी पाकिस्तान असून, तिथे आपल्याकडून चहा निर्यात होतो. पण कधी कधी तो लांबून दुबई मार्ग जातो, तर कधी स्मगलिंगच्या मार्गाने जातो. आज पाकिस्तानसाठी खूप काही करता येऊ शकले असते, परंतु, दोन्ही देशाचे संबंध चांगले नाहीत. खरंतर दोन्ही देश आनंदात राहू शकले असते, पण हे झाले नाही,’’अशी खंत भारताचे परराष्ट्र खात्याचे माजी सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केली.

आर्याबाग सांस्कृतिक परिवारातर्फे आयोजित आणि ज्ञानेश्वर मुळे लिखित 'माणूस आणि मुक्काम ' या पुस्तकाचे प्रकाशन माजी भारतीय वनसेवा अधिकारी रंगनाथ नाईकडे यांच्या हस्ते झाले. या वेळी आर्याबाग सांस्कृतिक परिवाराचे संस्थापक कल्याण तावरे, चांगुलपणाची चळवळचे अध्यक्ष राज देशमुख, प्रकाशन दिलीप चव्हाण, विराज तावरे आदी उपस्थित होते.

मुळे म्हणाले,‘‘मी माझ्या विदेशात काम केलेल्या अनुभवावर हे पुस्तक लिहिले आहे. यापूर्वी हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत प्रकाशन झाले आहे आणि आज मराठीमध्ये प्रकाशन होत आहे. पुस्तक लिहिणं ही एक तपश्चर्या आहे. पुस्तके आपल्याला खूप काही शिकवून जातात. त्यात अनुभवांचे बोल असतात. मी कादंबरी लिहिली नाही, तो माझा पिंड नाही. अनुवभवांची शिदोरी या पुस्तकात तुम्हाला चाखायला मिळेल.’’  

जगातल्या दहा देशातील पंतप्रधान आपले भारतीय आहेत. आपल्या देशासाठी काम करायचे सोडून इथले लोकं परदेशी जातात. साडेतीन कोटी लोकं विदेशात स्थायिक आहेत. मोठ्या पदावर आहेत. हे लोक इथून का गेले? का भारतीय व्यक्ती बाहेर जातो. नोबेल का मिळत नाहीय आपल्याला ? हा देश समृद्ध झाला पाहिजे ना ! आजही ३०-४० कोटी लोकं अशी आहेत, ज्यांना सर्व‌ सुविधा मिळत नाहीत. केवळ दहा टक्के लोकांकडे संपत्ती आहे. अशाने देश सर्वंकष प्रगती कशी करेल, अशी खंतही मुळे यांनी व्यक्त केली.

...पण ते आपण विसरतोय की काय?

आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाली आहेत. आता आपण धर्म-जातीच्या पलीकडे जायला हवं. वैश्विक विचार रूजवायला हवा. संत तुकोबांनी हे विश्वची माझे घर असे म्हटलेच आहे. पण ते आपण विसरतोय की काय ? आपली संस्कृती ही सर्वांना सामावून घेणारी आहे. त्याप्रमाणे आपण वागले पाहिजे.  - ज्ञानेश्वर मुळे  

टॅग्स :PuneपुणेIndiaभारतPakistanपाकिस्तानSocialसामाजिकPoliticsराजकारण