शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

...तर भारत-पाक देश आनंदात राहू शकले असते! परराष्ट्रखात्याचे माजी सचिव ज्ञानेश्वर मुळे यांची खंत

By श्रीकिशन काळे | Updated: October 19, 2023 15:29 IST

आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाली, आता आपण धर्म-जातीच्या पलीकडे जायला हवं

पुणे:‘‘ मी जगभर फिरलो. अनेक देशात राहिलो. सर्वत्र खूप छान अनुभव आले. पण कुठेही गेलो तरी आपला शेजारी मात्र बदलता येत नाही. हे सत्य आहे. आपल्या शेजारी पाकिस्तान असून, तिथे आपल्याकडून चहा निर्यात होतो. पण कधी कधी तो लांबून दुबई मार्ग जातो, तर कधी स्मगलिंगच्या मार्गाने जातो. आज पाकिस्तानसाठी खूप काही करता येऊ शकले असते, परंतु, दोन्ही देशाचे संबंध चांगले नाहीत. खरंतर दोन्ही देश आनंदात राहू शकले असते, पण हे झाले नाही,’’अशी खंत भारताचे परराष्ट्र खात्याचे माजी सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केली.

आर्याबाग सांस्कृतिक परिवारातर्फे आयोजित आणि ज्ञानेश्वर मुळे लिखित 'माणूस आणि मुक्काम ' या पुस्तकाचे प्रकाशन माजी भारतीय वनसेवा अधिकारी रंगनाथ नाईकडे यांच्या हस्ते झाले. या वेळी आर्याबाग सांस्कृतिक परिवाराचे संस्थापक कल्याण तावरे, चांगुलपणाची चळवळचे अध्यक्ष राज देशमुख, प्रकाशन दिलीप चव्हाण, विराज तावरे आदी उपस्थित होते.

मुळे म्हणाले,‘‘मी माझ्या विदेशात काम केलेल्या अनुभवावर हे पुस्तक लिहिले आहे. यापूर्वी हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत प्रकाशन झाले आहे आणि आज मराठीमध्ये प्रकाशन होत आहे. पुस्तक लिहिणं ही एक तपश्चर्या आहे. पुस्तके आपल्याला खूप काही शिकवून जातात. त्यात अनुभवांचे बोल असतात. मी कादंबरी लिहिली नाही, तो माझा पिंड नाही. अनुवभवांची शिदोरी या पुस्तकात तुम्हाला चाखायला मिळेल.’’  

जगातल्या दहा देशातील पंतप्रधान आपले भारतीय आहेत. आपल्या देशासाठी काम करायचे सोडून इथले लोकं परदेशी जातात. साडेतीन कोटी लोकं विदेशात स्थायिक आहेत. मोठ्या पदावर आहेत. हे लोक इथून का गेले? का भारतीय व्यक्ती बाहेर जातो. नोबेल का मिळत नाहीय आपल्याला ? हा देश समृद्ध झाला पाहिजे ना ! आजही ३०-४० कोटी लोकं अशी आहेत, ज्यांना सर्व‌ सुविधा मिळत नाहीत. केवळ दहा टक्के लोकांकडे संपत्ती आहे. अशाने देश सर्वंकष प्रगती कशी करेल, अशी खंतही मुळे यांनी व्यक्त केली.

...पण ते आपण विसरतोय की काय?

आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाली आहेत. आता आपण धर्म-जातीच्या पलीकडे जायला हवं. वैश्विक विचार रूजवायला हवा. संत तुकोबांनी हे विश्वची माझे घर असे म्हटलेच आहे. पण ते आपण विसरतोय की काय ? आपली संस्कृती ही सर्वांना सामावून घेणारी आहे. त्याप्रमाणे आपण वागले पाहिजे.  - ज्ञानेश्वर मुळे  

टॅग्स :PuneपुणेIndiaभारतPakistanपाकिस्तानSocialसामाजिकPoliticsराजकारण