शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

...तोवर सरकार आले तर चांगलेच होईल : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 20:24 IST

’हिंदू’ शब्दावर अनेकांचा आक्षेप आहे. पण हा शब्द कुणालाच कळला नाही.

ठळक मुद्दे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी ग्रंथालय तसेच काश्मीर महोत्सवाचे उद्घाटन पुढील वर्षभरात काश्मिरी मुलींना पुण्यात शिक्षणासाठी आणायची इच्छा प्रदर्शित मुलींच्या शिक्षणाचा सर्व खर्च लोकसहभागातून केला जाईल..

पुणे : पुढील वर्षभरात काश्मिरी मुलींना शिक्षणासाठी पुण्यात आणण्याकरिता सरहदकडून प्रयत्न केले जात आहेत. या मुलींच्या शिक्षणाचा सर्व खर्च लोकसहभागातून केला जाईल, असे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले. ’तोवर सरकार आले तर चांगलेच होईल’ अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली. सरहदद कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अँंड सायन्स, कात्रज च्या वतीने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी ग्रंथालय तसेच काश्मीर महोत्सवाचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश सचिव राजेश पांडे, अध्यक्षस्थानी  लेफ्टनंट जनरल ( निवृत्त) विनायक पाटणकर तसेच सरहद चे संजय नहार, शैलेश पगारिया, युवराज शहा उपस्थित होते.संजय नहार यांनी प्रास्ताविकात पुढील वर्षभरात काश्मिरी मुलींना पुण्यात शिक्षणासाठी आणायची इच्छा प्रदर्शित केली. तोच धागा पकडत चंद्रकांत पाटील म्हणाले, सरकार गेले तरी ताकद खूप आहे. मात्र सरकार असतं तर कार्याचा विस्तार खूप मोठा असता. सरहदद पुढील वर्षभरात काश्मिरी मुलींना पुण्यात शिक्षणासाठी आणू इच्छित आहे. त्यांच्या शिक्षणाचा खर्च लोकसहभागातून केला जाईल.’हिंदू’ शब्दावर अनेकांचा आक्षेप आहे. पण हा शब्द कुणालाच कळला नाही. जो आम्हाला अटलबिहारी वाजपेयीजींकडून कळला. ’हिंदू’ म्हणजे एक व्यवहार आहे. सर्व धर्मीय हे व्यवहाराने हिंदू आहेत. म्हणून हे हिंदू राष्ट्र आहे.  मग आक्षेप का?  तेच कळत नाही असे पाटील यांनी सांगितले. विनायक पाटणकर यांनी समाजाची शक्ती त्याचा सांस्कृतिक वारसा असते. काश्मिरीयत जिवंत आहे. तोपर्यंत काश्मीरला कुणीही आपल्यापासून हिरावू शकणार नसल्याचे सांगितले.झायद भट यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :PuneपुणेSarhadसरहद संस्थाSanjay Naharसंजय नहारchandrakant patilचंद्रकांत पाटीलGovernmentसरकारJammu Kashmirजम्मू-काश्मीर