शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

या ध्वजासाठी ‘त्यांचे’ बलिदान!

By admin | Updated: November 23, 2015 00:04 IST

निरोपाची विहित प्रक्रिया : कायम सोबत राहणारा तिरंगा हेच वीरपत्नीचे खरे आभूषण--सलाम सातारा-तीन

राजीव मुळ्ये --- सातारा -शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवावरील तिरंगा लष्करी जवानांनी घडी करून वीरपत्नी स्वाती महाडिक यांच्या हाती दिला आणि दु:ख-अभिमानाच्या मिश्रणातून त्यांचं मन भरून आलं. हा तिरंगा आता कायम त्यांच्याजवळ राहील. याच ध्वजासाठी कर्नल संतोष यांनी सर्वोच्च त्याग केला, याची अभिमानास्पद आठवण म्हणून!कर्नल महाडिक यांच्यावर गुरुवारी (दि. १९) पोगरवाडी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हुतात्मा जवानाला निरोप देताना साऱ्यांचाच कंठ दाटतो परंतु निरोपाच्या विहित प्रक्रियेची माहिती नागरिकांना अभावानेच असते. आर्मी अ‍ॅक्ट, नेव्ही अ‍ॅक्ट आणि एअर फोर्स अ‍ॅक्टमध्ये नमूद केल्यानुसार ही प्रक्रिया पार पडते. युद्धात अथवा शांतीच्या काळातही ड्यूटीवर असताना कामी आलेला प्रत्येक जवान या इतमामास पात्र असतो. काही वेळा जवानाचे पार्थिव मिळून येत नाही. विशेषत: नौदलाच्या जवानाच्या बाबतीत अशी घटना घडू शकते. असा जवानही या इतमामास पात्र असतो. लष्करी शिस्तीला अनुसरून ही विहित प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी हुतात्मा जवानाच्या ‘पॅरेन्ट रेजिमेन्ट’ची असते. अगदी लष्करी वाहनातून पार्थिव कसे बाहेर काढायचे, इथपासून प्रत्येक बारीकसारीक बाबी ठरलेल्या आहेत. शवपेटी चितेजवळ ठेवल्यानंतर त्यावरील तिरंगा दोन जवान काढून घेतात. ठरलेल्या प्रक्रियेने त्याची घडी घातली जाते आणि तो तिरंगा हुतात्म्याच्या पत्नीकडे किंवा अन्य वारसाकडे सोपविला जातो. जवानाच्या बलिदानाचे स्मरण म्हणून हा ध्वज कायम त्याच कुटुंबात राहतो. अंत्यसंस्कारांपूर्वी मान्यवरांकडून पुष्पचक्र वाहण्यात येते. प्रत्येक पुष्पचक्रावर ते कोणाच्या वतीने वाहिले जात आहे, त्याचे नाव लिहिलेले असते. संबंधित नेता किंवा वरिष्ठ मुलकी अधिकाऱ्याकडून दोन जवान हे पुष्पचक्र ताब्यात घेतात आणि विशिष्ट प्रकारे पावले टाकत शवपेटीजवळ अर्पण करतात. लष्करात ‘धीरे चल’, ‘तेज चल’, ‘दौड के चल’ अशा एकंदर पाच प्रकारच्या ‘चाली’ असतात. हुतात्म्याला निरोप देतानाची सर्व प्रक्रिया ‘धीरे चल’ आदेशाने चालते. पुष्पचक्र वाहणारी व्यक्ती सहसा पार्थिवापर्यंत जात नाही. जवानच चक्र घेऊन जातात. पार्थिव चितेवर ठेवल्यानंतर बिगूल वाजतो. त्यावेळी मानवंदना देणारे सर्व जवान एकसाथ आपली रायफल उलटी करतात. हे शोकाचे निदर्शक असून, या प्रक्रियेला ‘शोकसत्र’ म्हटले जाते. त्यानंतर रायफली खांद्यावर घेऊन ‘फायरिंग’ केले जाते. ही जवानाच्या शौर्याला लष्कराने दिलेली सलामी होय.हुतात्मा जवान पदकविजेता असेल, तर निरोपाची ही विहित प्रक्रिया काहीशी बदलते. पदकाच्या दर्जानुसार मानवंदना दिली जाते. परमवीरचक्र, महावीरचक्र आणि वीरचक्र ही युद्धकाळात मिळणारी पदके असून, शौर्यचक्र हा शांतिकाळातील सर्वोच्च सन्मान आहे. त्या-त्या पुरस्कारानुसार सलामीची पद्धत ठरलेली असते आणि त्यानुसारच ती पार पडते. हुतात्म्याला निरोप देण्याची ही प्रक्रिया ‘पॅरेन्ट रेजिमेन्ट’च पार पाडते. तथापि, काही विशिष्ट परिस्थितीत ‘पॅरेन्ट रेजिमेन्ट’ला जवानाच्या मूळगावी जाऊन ही प्रक्रिया पार पाडणे शक्य नसते. दोन्ही परिस्थितीत ही बाब सरकारला कळविणे ही संबंधित रेजिमेन्टची जबाबदारी असते. निरोप देण्यासाठी येणे रेजिमेन्टला शक्य नसल्यास सरकारतर्फे तसे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना कळविले जाते. मग स्थानिक पोलिसांकडून शासकीय इतमामात हुतात्म्याला अंतिम मानवंदना देणे ही जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे राहते. अभ्यासक्रामतच समावेशशासकीय इतमामात आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार यातील फरक अनेकांना माहीत नसतो. ज्येष्ठ नेते, मंत्री किंवा अन्य महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन झाल्यावर त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात. तथापि, त्यात लष्कराची कोणतीही जबाबदारी नसते. ही प्रक्रिया पोलीस दलातर्फे पार पाडली जाते. लष्कर केवळ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान दर्जाच्या व्यक्तीचे निधन झाल्यासच सलामी देते. लष्करी इतमामात जवानावर अंत्यसंस्कार करण्याच्या प्रक्रियेचा समावेश ‘लीडरशिप रँक’च्या अभ्यासक्रमातच केलेला असतो. सामान्यत: ‘प्लाटून कमांडर’पदापासून ‘लीडरशिप रँक’चा अभ्यासक्रम शिकविला जातो.