शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

महापालिकेच्या पाण्याची होते चोरी : आयुक्तांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 07:00 IST

पुणेकरांना तुम्हाला माहित आहे का, तुमचे पाणी चोरीला जातेय ?

ठळक मुद्दे चोरी-गळतीने साडेपाच टीएमसीचे होतेय नुकसानमहापालिका आणि पाटबंधारे विभागात झालेला पाणी करार फेब्रुवारी २०१९मधे संपुष्टात उच्च न्यायालयाने पाणी कोटा निश्चित करण्याचे महापालिकेला दिले आदेश

- विशाल शिर्के पुणे : पुणेकरांना तुम्हाला माहित आहे का, तुमचे पाणी चोरीला जातेय ? एक नव्हे दोन नव्हे तब्बल साडेपाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी चोरी आणि गळतीद्वारे झिरपत आहे. खुद्द महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी जलसंपदा विभागाला ही माहिती लेखी कळविली आहे. चोरी कोणत्या मार्गाने होते याचे मात्र स्पष्टीकरण त्यात देण्यात आले नाही. महानगरपालिकेचा पाणी वापराबाबत जलसंपदा विभागाच्या वाद निवारण अधिकारी, जलसंपत्ती प्राधिकरण आणि उच्च न्यायालयात दावे सुरु आहेत. महापालिका आणि पाटबंधारे विभागात झालेला पाणी करार फेब्रुवारी २०१९मधे संपुष्टात आला आहे. उच्च न्यायालयाने पाणी कोटा निश्चित करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने १२ एप्रिल २०१९ रोजी जलसंपदा विभागाला लेखी कळविले असून, त्यात प्रथमच गळती बरोबरच पाणी चोरीचा देखील उल्लेख केला आहे. ही कागदपत्रे '' लोकमत '' ला मिळाली आहेत. सप्टेंबर २०१७ मध्ये पुणे शहराला लोकसंख्येच्या नुसार वार्षिक ८.१९ टीएमसी (दररोज ६३५ एमएलडी) पाणी वापरास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मंजुरी दिली होती. त्यानंतर खडकवासला प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या ४ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत पुणे शहराला वार्षिक ११.५० टीएमसी (दररोज ८९२ एमएलडी) पाणी देण्याचा निर्णय झाला. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहराला पाणी कमी देणे परवडणारे नसल्याने, राज्य सरकारने १३०० ते १३५० दशलक्ष लिटर पाणी वापराची सूचना दिली होती. सध्याही तसाच वापर सुरु आहे. हा पाणीवापर वार्षिक १७ टीएमसी इतका होतो. महापालिकेची लोकसंख्या, तरल लोकसंख्या, हद्दीलगतची गावे, व्यावसायिक पाण्याचा वापर, पाच वर्षे वयाखालील मुलांची संख्या, भाडेकरु, विविध स्पर्धा परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांचा विचार पाणी वापरात आवश्यक असल्याचे महापालिका राव यांनी १२ एप्रिल २०१९ रोजी जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. शहरातील वितरण व्यवस्था अंदाजे ४० ते ५० वर्षे जुनी असून, त्यातून गळती आणि पाणी चोरीचे प्रमाण तब्बल २५ टक्के असल्याचे म्हटले आहे. या पुर्वी महापालिकेने दिलेल्या माहितीमध्ये ३५ ते ४० टक्के पाणी गळती असल्याचा उल्लेख येतो. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीSaurabh Raoसौरभ राव