शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

संगीत नाटकांसाठी नाट्यगृहे उपलब्ध व्हावीत : चारुदत्त आफळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 12:24 IST

महाराष्ट्राला संगीत नाटकांची समृध्द परंपरा लाभली आहे. मात्र..

ठळक मुद्दे चारुदत्त आफळे यांना शास्त्रीय गायक पं. शौनक अभिषेकी यांच्या हस्ते बालगंधर्व पुरस्कार

पुणे : महाराष्ट्राला संगीत नाटकांची समृध्द परंपरा लाभली आहे. मात्र, या परंपरेचा म्हणावा तितका प्रचार आणि प्रसार झालेला नाही. कलाकारांप्रमाणेच महानगरपालिकेने यासाठी पुढाकार घ्यायला हवा.सध्याची संगीत नाटकांची परिस्थिती विचित्र आहे. महापालिकेने महिन्याच्या एका शनिवार आणि रविवारी नाट्यगृहे उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून कलाकारांना कायमस्वरुपी काम उपलब्ध होईल, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते आणि कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले. माज्या यशामध्ये शिलेदार नाटक कंपनी, भरत नाट्य संशोधन मंदिर यांच्यासह अनेक संस्था आणि व्यक्तींचा मोठा वाटा आहे, असेही त्यांनी नमूद केले.पुणे महानगरपालिकेतर्फे शुक्रवारी चारुदत्त आफळे यांना शास्त्रीय गायक पं. शौनक अभिषेकी यांच्या हस्ते बालगंधर्व पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक गायत्री खडके, ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी दामले आदी या वेळी उपस्थित होते. कला क्षेत्रातील कामगिरीबद्दल ऋत्विक व्यास, गौरव बर्वे, अरुण जगताप, अली हुसेन, कविता टिकेकर, कुमार गोखले  यांनाही विशेष पुरस्कार देऊन गौैरवण्यात आले. आफळे म्हणाले, आम्ही जेव्हा एखाद्या नाटकाचा प्रयोग सादर करण्यासाठी परदेशी जातो, तेव्हा तेथील गाजलेल्या नाटककारांचे प्रयोग पाहण्याची प्रचंड उत्सुकता असते. अनेक प्रयत्नांनंतर आम्ही तिकीटे मिळवून ते प्रयोग पाहतो. परंतु, एखादा परदेशी रसिक पुण्यात, महाराष्ट्रात येतो, तेव्हा त्याला संगीत नाटकाच्या परंपरेबद्दल असे वाटत नाही. अर्थिक कारणांमुळे नाटकात काम करण्यासाठी कलाकार मिळत नाहीत. अनेकदा प्रयोगांची शाश्वती नसल्याने उदयोन्मुख कलावंत संगीत नाटकांकडे पाठ फिरवत आहेत.  शौनक अभिषेकी म्हणाले, मास्टर दीनानाथ, बालगंधर्व, पं. जितेंद्र अभिषेकी, वंसतराव देशपांडे या मंडळींनी अभिजात संगीताची परंपरा अजरामर केली आहे. यांच्यामुळेच आम्ही आज संगीताची साधना करू शकतो. आमची पिढी या व्यक्तींच्या कायम ऋणात राहील, यात मला शंका वाटत नाही. चारुदत्त आफळे यांच्या रुपाने कीर्तन आणि अभिजात संगीत अशा दोन्ही परंपरा जपल्या जात आहेत, याबद्दल विलक्षण समाधान वाटते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात चारुदत्त आफळे यांनी बालगंधर्व यांच्यावर आधारीत कीर्तन सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.-----------------खंडित वीजपुरवठ्यामुळे किर्तनात खंडशुक्रवारी शहरात मुसळधार पावसाने दिवसभर हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. बालगंधर्व पुरस्कार सोहळयालाही या खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागला. पुरस्कार सोहळयानंतर ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, व्यासपीठावरील वीज गेल्याने तब्बल सहा वेळा किर्तन थांबवावे लागले. त्यामुळे कलाकारांना व्यत्यय आलाच; मात्र, महापालिकेच्या या कारभारावर  उपस्थितांनीही ताशेरे ओढले.

टॅग्स :PuneपुणेCharudatta Aafleचारुदत्त आफळेBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका