शहरं
Join us  
Trending Stories
1
महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
3
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
4
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
5
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
6
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
7
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
8
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
9
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
10
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
11
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
12
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
13
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
14
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
15
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
16
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
17
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
18
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
19
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
20
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

चाकण, मोई, निघोजेतील नाले करताहेत ‘इंद्रायणी’ला प्रदूषित; MIDC चे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 12:35 IST

याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीएमआरडीए, एमआयडीसी आणि नगरपालिका इतर आस्थापनांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत...

- विश्वास मोरे

पिंपरी :इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत 'लोकमत'ने आवाज उठवल्यानंतर प्रदूषण महामंडळाच्या वतीने नदीतील पाण्याची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये चिखली, चिंबळी ते आळंदी परिसरातील सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित झाल्याचे आढळून आले आहे. पाण्यातील बीओडी आणि सीओडी, तसेच डिटर्जंट आणि फॉस्फरसचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीएमआरडीए, एमआयडीसी आणि नगरपालिका इतर आस्थापनांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

वारकरी संप्रदायाचे तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या देहू आणि आळंदी परिसरातून इंद्रायणी नदी वाहते. नदीच्या दोन्ही बाजूंना नागरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढच होत आहे. दिनांक २ ते १५ जानेवारीपर्यंत इंद्रायणी नदी फेसाळत होती. याबाबत 'लोकमत'ने आवाज उठवला होता, तसेच पर्यावरणवादी संघटनांनी नदीचे प्रदूषण रोखण्याची मागणी केली होती.

याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने पाहणी करण्यात आली होती. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराच्या बाजूने रसायनयुक्त पाणी नदीत जात नसल्याची खातरजमा महापालिकेने केली होती. मात्र, विरुद्ध भागात असणारे नाले थेटपणे नदीत सोडल्याचे दिसून आले.

या भागातील नाल्यांमुळे होते प्रदूषण

इंद्रायणी नदीच्या प्रदूषणास निघोजे, मोई, चिंबळी या परिसरात मोठ्या प्रमाणावर झालेले नागरीकरण कारणीभूत आहे, तसेच या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर छोटे-मोठे उद्योग सुरू झाले आहेत आणि या उद्योगांचे पाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात आहे. या भागातील सांडपाण्यामुळे नदीचे प्रदूषण अधिक होत असल्याचे पर्यावरणवादी संघटनांनी केलेल्या पाहणीत आढळून आले. या भागातील पाण्याच्या प्रदूषणावर कारवाई करायची कोणी, हा मोठा प्रश्न आहे.

इंद्रायणी नदीवरील चिखली, चिंबळी आणि आळंदी या तीन भागांतील बीओडी, सीओडी, डीओ, डिटर्जंट आणि फॉस्फरेट अशा पाच गोष्टींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये डिटर्जंट आणि फॉस्फरेटचे प्रमाण, तसेच सीओडीचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून येत आहे.

इंद्रायणी नदी फेसाळली आहे, याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर आम्ही तीन ठिकाणच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आलेला आहे. त्यामध्ये अधिकाधिक प्रदूषण हे डिटर्जंटचे असल्याचे दिसून आले, तसेच सीओडी, बीओडी वाढल्याचे दिसून आले. या परिसरात नदीच्या परिसरातील नाल्यांची तपासणी प्रशासनाने करण्याची गरज आहे, तसेच त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. सांडपाणी नदीमध्ये जाणारे सांडपाणी रोखले तर प्रदूषण कमी होणार आहे.

- मंचक जाधव, प्रदूषण नियंत्रण मंडळ, अधिकारी

टॅग्स :indrayaniइंद्रायणीPuneपुणेwater pollutionजल प्रदूषण