शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

चाकण, मोई, निघोजेतील नाले करताहेत ‘इंद्रायणी’ला प्रदूषित; MIDC चे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 12:35 IST

याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीएमआरडीए, एमआयडीसी आणि नगरपालिका इतर आस्थापनांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत...

- विश्वास मोरे

पिंपरी :इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत 'लोकमत'ने आवाज उठवल्यानंतर प्रदूषण महामंडळाच्या वतीने नदीतील पाण्याची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये चिखली, चिंबळी ते आळंदी परिसरातील सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित झाल्याचे आढळून आले आहे. पाण्यातील बीओडी आणि सीओडी, तसेच डिटर्जंट आणि फॉस्फरसचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीएमआरडीए, एमआयडीसी आणि नगरपालिका इतर आस्थापनांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

वारकरी संप्रदायाचे तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या देहू आणि आळंदी परिसरातून इंद्रायणी नदी वाहते. नदीच्या दोन्ही बाजूंना नागरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढच होत आहे. दिनांक २ ते १५ जानेवारीपर्यंत इंद्रायणी नदी फेसाळत होती. याबाबत 'लोकमत'ने आवाज उठवला होता, तसेच पर्यावरणवादी संघटनांनी नदीचे प्रदूषण रोखण्याची मागणी केली होती.

याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने पाहणी करण्यात आली होती. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराच्या बाजूने रसायनयुक्त पाणी नदीत जात नसल्याची खातरजमा महापालिकेने केली होती. मात्र, विरुद्ध भागात असणारे नाले थेटपणे नदीत सोडल्याचे दिसून आले.

या भागातील नाल्यांमुळे होते प्रदूषण

इंद्रायणी नदीच्या प्रदूषणास निघोजे, मोई, चिंबळी या परिसरात मोठ्या प्रमाणावर झालेले नागरीकरण कारणीभूत आहे, तसेच या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर छोटे-मोठे उद्योग सुरू झाले आहेत आणि या उद्योगांचे पाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात आहे. या भागातील सांडपाण्यामुळे नदीचे प्रदूषण अधिक होत असल्याचे पर्यावरणवादी संघटनांनी केलेल्या पाहणीत आढळून आले. या भागातील पाण्याच्या प्रदूषणावर कारवाई करायची कोणी, हा मोठा प्रश्न आहे.

इंद्रायणी नदीवरील चिखली, चिंबळी आणि आळंदी या तीन भागांतील बीओडी, सीओडी, डीओ, डिटर्जंट आणि फॉस्फरेट अशा पाच गोष्टींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये डिटर्जंट आणि फॉस्फरेटचे प्रमाण, तसेच सीओडीचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून येत आहे.

इंद्रायणी नदी फेसाळली आहे, याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर आम्ही तीन ठिकाणच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आलेला आहे. त्यामध्ये अधिकाधिक प्रदूषण हे डिटर्जंटचे असल्याचे दिसून आले, तसेच सीओडी, बीओडी वाढल्याचे दिसून आले. या परिसरात नदीच्या परिसरातील नाल्यांची तपासणी प्रशासनाने करण्याची गरज आहे, तसेच त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. सांडपाणी नदीमध्ये जाणारे सांडपाणी रोखले तर प्रदूषण कमी होणार आहे.

- मंचक जाधव, प्रदूषण नियंत्रण मंडळ, अधिकारी

टॅग्स :indrayaniइंद्रायणीPuneपुणेwater pollutionजल प्रदूषण