शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

राज्यातील सर्व टोलनाक्यांचे अर्थात रस्त्यांवरील खर्च राज्य सरकारने जाहीर करावा; सजग नागरिक मंचाची मागणी

By नितीन चौधरी | Updated: October 9, 2023 15:48 IST

एखाद्या एक्सप्रेस वेची महिनाभरात अंदाजे १०० ते १२० कोटी टोलवसुली होते

पुणे : राज्य सरकारने २०१५ मध्ये ५३ टोलनाके बंद केले तरी अद्याप २६ टोलनाके सुरूच आहेत. या रस्त्यांच्या बांधकामांसाठी आलेला खर्च वसूल होईपर्यंत टोल वसूल करता येतो. मात्र, राज्यातील कोणत्याही रस्त्यावर टोलवसुली करताना संबंधित टोलनाक्यावरून किती वसुली झाली, खर्च वसुल झाला का, किती वर्षे टोल वसुल झाला याची कोणतीही माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा राज्य रस्ते विकास महामंडळाने अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे टोल या विषयात अपारदर्शकता असल्यानेच टोलमध्ये झोल आहे असा संशय नागरिकांच्या मनात आहे.

पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर महिन्याकाठी १०० ते ११० कोटी वसुली होते. ऑगस्ट २०२३ मध्ये एक्सप्रेस वेवरील चार टोलनाक्यांवरून ११८ कोटी १८ लाख ४९ हजार ९१९ रुपयांची टोलवसुली करण्यात आली. तर जुलैत हीच टोलवसुली १११ कोटी ९८ लाख १५ हजार ७३१ रुपये इतकी होती. याचाच अर्थ वर्षाकाठी किमान १ हजार २०० ते १ हजार ४०० कोटींची वसुली होते. या रस्त्याचे काम १९९९ मध्ये सुरू करण्यात आले. २००२ पासून या रस्त्यावर टोल वसुली सुरू करण्यात आली. तत्कालिन सरकारने या प्रकल्पासाठी सुमारे ५ हजार कोटींचा खर्च आल्याची माहिती दिली होती. मात्र, २००२ ते २०२३ या २२ वर्षांच्या काळात किमान २२ हजार कोटींचा टोल वसूल झाला असेल अशी शक्यता आहे. मात्र, या प्रकल्पासाठीचा बांधकाम, दुरुस्ती व देखभालीचा खर्च, टोल वसुलीचा खर्च व व्याज नेमके किती याची माहिती रस्ते विकास महामंडळाने अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे हा टोल आणखी किती वर्षे वसुल करण्यात येईल, हे कळत नाही. त्यामुळे राज्यातील सर्व टोलनाक्यांचे अर्थात रस्त्यांवरील खर्च राज्य सरकारने जाहीर करावा, अशी मागणी पुण्यातील सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

२६ ठिकाणी टोल सुरूच

तत्कालिन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये विधीमंडळ अधिवेशनात केलेल्या निवेदनानुसार ३१ मे २०१५ रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ३८ टोलनाक्यांपैकी ११ व राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ५३ पैकी १ अशी एकूण १२ टोलनाके बंद करण्यात आल्याची माहिती दिली होती. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडील उर्वरित २७ तसेच रस्ते विकास महामंडळाच्या २६ अशा एकूण ५३ टोलनाक्यांवर कार, जीप व एसटी महामंडळाच्या बस अशा वाहनांना टोलमधून सूट देण्यात आल्याचीही घोषणा केली होती. त्यामोबदल्यात संबंधित टोलनाकाचालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सुद्धा २०१७ मध्ये घेण्यात आला होता. मात्र, पुणे मुंबई एक्सप्रेस वे, जुना पुणे मुंबई महामार्ग, मुंबईत शिरण्याची ठिकाणे, वरळी सी लिंक, समृद्धी महामार्ग या महत्त्वाच्या रस्त्यांसह २६ रस्त्यांवरील टोलनाके अद्याप लहान वाहनांसाठी तसेच एसटी बससाठी मोफत करण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या रस्त्यांसाठीचा खर्च किती वसूल झाला व किती काळ काळ टोल सुरू राहील याबाबत सरकारने अळिमिळी गुपचिळी असे धोरण स्वीकारल्याचा आरोपही वेलणकर यांनी केला आहे.

आकडेवारी पारदर्शकपणे जाहीर करावी

राज्यातील सर्व टोलच्या भांडवलाची आकडेवारी पारदर्शकपणे जाहीर करावी. हा सामान्यांचा पैसा वसूल होत असल्याने खर्च किती झाला व वसूल किती झाला हे त्यातून कळेल. - विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे

टॅग्स :Puneपुणेtollplazaटोलनाकाhighwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूकMONEYपैसाGovernmentसरकार