शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

परतीच्या पावसाने पुणेकरांची झोप उडाली, धो धो कोसळला; झाडेही उन्मळून पडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 09:57 IST

पुण्यात झालेल्या जोरदार पावसानं नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. अनेक भाग पाणी शिरलं आहे

पुणे  - राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून पुणेकरांना सोमवारी मध्यरात्री चांगलंच झोडपलं आहे. पुण्यातील मुख्य बाजारपेठेला नदीचे स्वरुप आले होते. तर दगडूशेठ गणपती मंदिरातही पाणी साठलं होतं. येथील कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत मंदिरातील पाणी बाहेर काढण्याचं काम केलं. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणीचा मोठा प्रवाह वाहत होता. या प्रवाहात काही ठिकाणी गाड्याही वाहिल्याचे व्हिडिओ आता समोर येत आहेत. एकूणच पुण्यातील पावसाने पुणेकरांची झोप उडाल्याचं पाहायला मिळालं. 

पुण्यात झालेल्या जोरदार पावसानं नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. अनेक भाग पाणी शिरलं आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. शहरासह ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे, शेती पिकांचेही नुकसान झाल्याचे समजते. येवलेवाडी स्मशानभूमीजवळ सुखसागर नगर, अंबामाता मंदिर कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ सुखसागर नगर, डॉल्फिन चौक, बी टी कवडे रोड, अग्निशमन केंद्र समोर हडपसर, गाडीतळ या भागात चांगलंच पाणी साचलं होतं. तर, काही भागात झाडेही उन्मळून पडली आहेत.

पुण्यातील पावसाचे व्हिडिओ आणि फोटो ट्विटर आणि सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. त्यासोबतच, पडत्या पावसात एकमेकांच्या मदतीला येणारे पुणेकरही दिसून आले. एकंदरीतच पुण्याचा रात्रीचा पाऊस यंदाच्या पावासाळ्यातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा पाऊस झाल्याचं समजत आहे. 

दरम्यान, शिवाजीनगर परिसरात रात्री साडेअकरा वाजेपर्यंत तब्बल 81 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.कोंढवा खुर्द भाजी मंडई येथे एका ठिकाणी पाण्यात 7 नागरिक अडकले होते. यामध्ये 5 मोठे नागरिक आणि 2 लहान मुलांचा समावेश होता. त्यांना रश्शीच्या साह्यानं सुखरुप बाहेर काढलं आहे. मंगळवार पेठेतही पाणी शिरलं होतं. सदाआनंदनगरमधून पाच जणांना सुखरुन बाहरे काढलं आहे. यामध्ये  3 लहान मुली 1 महिला 1 पुरुष होते. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMumbaiमुंबई