शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
4
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
5
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
6
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
7
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
8
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
9
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
10
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
11
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
12
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
14
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
15
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
16
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
17
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
18
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
19
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
20
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला

बालगंधर्वांनी उंचीवर नेलेली संगीत रंगभूमी पुढे नेण्याची जबाबदारी नवीन पिढीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 10:08 IST

बालगंधर्वांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेली संगीत रंगभूमीची संस्कृती प्रवाही ठेवण्याची आणि पुढे नेण्याची जबाबदारी नवीन पिढीची आहे, असे मत माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.

पुणे : कोणतीही संस्कृती ही प्रवाही नदीसारखी असते. ती नदी प्रवाहित राहिली तरच ती नित्यनूतन आणि चैतन्यमयी राहते. बालगंधर्वांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेली संगीत रंगभूमीची संस्कृती प्रवाही ठेवण्याची आणि पुढे नेण्याची जबाबदारी नवीन पिढीची आहे, असे मत माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.

बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे यंदाचा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार प्रसिद्ध गायिका मंजुषा कुलकर्णी- पाटील यांना, तर ''कोहिनूर गंधर्व'' पुरस्कार प्रसिद्ध गायक पं. कैवल्यकुमार गुरव यांना आज प्रदान करण्यात आला, त्यावेळी प्रभू बोलत होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, पद्मश्री पं. उल्हास कशाळकर, कोहिनूर उद्योग समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, प्रसिद्ध सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी, बालगंधर्व संगीत रसिक एम मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, उमा सुरेश प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते. रुपये एक लाख ११ हजार असे बालगंधर्व गुणगौरव पुरस्काराचे, तर रुपये ५१ हजार असे ''कोहिनूर गंधर्व'' पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी सुरेश साखवळकर यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल, तर अवंती बायस यांना माणिक वर्मा पुरस्कार मिळाल्याबद्दल सुरेश प्रभू यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, बालगंधर्वांनी संगीत नाट्याला वेगळा आयाम प्राप्त करून दिला. बालगंधर्वांनी संगीत रंगभूमीवर स्वतः तर प्रेम केलेच; परंतु त्यांनी रसिकांनाही संगीत नाटकांवर प्रेम करायला शिकवले. बालगंधर्व हे संगीत रंगभूमीवरील दैवदुर्लभ व्यक्तिमत्त्व होते. संगीत रंगभूमीचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर समाज प्रबोधनासाठी देखील त्यांनी केला.पंडित उल्हास कशाळकर म्हणाले की, पूर्वी शास्त्रीय संगीत केवळ राजे रजवाड्यांमध्येच ऐकले जायचे. ते सर्वसामान्यांसाठी खुले नव्हते. संगीत रंगभूमीच्या माध्यमातून नाट्यगीतांद्वारे शास्त्रीय संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. संगीत नाट्य रंगभूमीने शास्त्रीय संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड