शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ताणतणाव, चिडचिडेपणा, नैराश्य मानसिक आजारांचं प्रमाण वाढतंय; तरुणाईमध्ये प्रमाण अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 14:05 IST

सर्दी, ताप खोकला किंवा पोटदुखी झाल्यास डॉक्टरांकडे धाव घेतो. पण मानसिक आजाराचे काय? त्याकडे आपण दुर्लक्ष करतोय

पुणे : विविध ताणतणाव आणि वाढत चाललेली स्पर्धा यामुळे प्रत्येक व्यक्तीला मानसिक ताणतणाव, नैराश्य आणि चिडचिडेपणाला सामाेरे जावे लागत आहे. परिणामी मानसिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यात प्रामुख्याने प्रत्येक दहा व्यक्तींमागे दाेन व्यक्ती मानसिक आजाराची शिकार हाेत आहेत. तरुणामध्येही मानसिक आजाराचे प्रमाण वाढत असून, २०३० पर्यंत नैराश्यामुळे मोठ्या प्रमाणात मानसिक दुबळेपणा वाढण्याचा धोका असल्याचे जागतिक आराेग्य संघटनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासातून निदर्शनास आले आहे.

शारीरिक आरोग्याइतकेच आज मानसिक आरोग्य सांभाळणे खूप आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार, राज्यात १४.३ टक्के म्हणजे २.६ कोटी प्रौढ लोक मानसिक आरोग्याशी झगडत असून, प्रत्येकी १० व्यक्तींपैकी किमान दोन व्यक्तींना मानसिक आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. कुणाला सर्दी, ताप खोकला किंवा पोटदुखी झाल्यास मागचा पुढचा विचार न करता डॉक्टरांकडे धाव घेतो. पण मानसिक आजाराचे काय? त्याकडे दुर्लक्ष करतो.

काय म्हणते राष्ट्रीय मानसिक आराेग्य सर्वेक्षण

- राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण २०१९ नुसार, देशातील १४ टक्के प्रौढ व्यक्तींमध्ये मानसिक आजाराची लक्षणे आहेत.- सुमारे ५.६ कोटी लोक नैराश्याने आणि ३.८० कोटी लोक चिंतेने ग्रस्त आहेत. जागतिक स्तरावर आणि देशात मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. महाराष्ट्रही त्याला अपवाद ठरलेला नाही.- मानसिक आजार योग्यवेळी निदान झाल्यास आजार बरे होण्याची शक्यता असते. पण पुरेशा मानसोपचार तज्ज्ञांच्या अभावी १५ कोटी मानसिक आजारी लोकांपैकी फक्त २५ टक्केच लोकांना उपचार मिळत असल्याचे राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणातून समोर आले आहे.- एक लाख लोकसंख्येमागे किमान १३ मानसिक आरोग्य कर्मचारी अपेक्षित असताना केवळ दोन मानसिक आरोग्य कर्मचारी व ०.३ मानसोपचार तज्ज्ञ उपलब्ध आहेत. ही परिस्थिती चिंताजनक आहे.- यावरून मानसिक आरोग्याला शासकीय पातळीवरही दुर्लक्षित केले असल्याचेच दिसते. त्यामुळे मानसिक आरोग्याच्या सेवा घेण्यासाठी पुणे, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर या चार प्रादेशिक मनोरुग्णालयांवरच भिस्त आहे.

८५ टक्के लाेकांना दरमहा २ ते ३ हजारांचा मानसाेपचारावर खर्च

जवळच्या सरकारी रुग्णालयातून मानसोपचाराच्या सेवा मिळत नसल्यामुळे ८५% लोकांना दर महिन्याला २ ते ३ हजारांचा महिन्याला खर्च करून खासगी रुग्णालयातून उपचार घ्यावे लागतात. हा खर्च बऱ्याच लोकांना परवडणारा नसल्याने, उपचार अर्ध्यावरच सोडले जातात. नॅशनल सॅम्पल सव्र्हे २०१७-१८ च्या अहवालात, मानसोपचार व मेंदूविकारांसाठी सरकारी रुग्णालयात ७,२३५ रु., तर खासगी रुग्णालयात ४१,२३९ रु. खर्च होत असल्याचे समोर आले आहे.

मानसिक आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण हाेणे आवश्यक आहे. त्याचबराेबर स्थानिक किंवा जवळच्या रुग्णालयात प्राथमिक सुविधा मिळाली, तर मानसिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण ५० टक्क्याने कमी होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासात दिसून आले आहे. - विनोद शेंडे, आरोग्य हक्क कार्यकर्ते व सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक-संशोधक

आजामितीला दहापैकी किमान दोन व्यक्तींना मानसिक आरोग्याशी निगडित समस्या निर्माण झाल्या आहेत. यात प्रामुख्याने २५ ते ३५ वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. कौटुंबिक जबाबदारी, नौकरी आणि आर्थिक ताणतणाव ही त्यामागील कारणे आहेत. लोकांमध्ये मानसोपचार तज्ज्ञांकडे येण्याचा कल वाढत आहे. लोकांमध्ये मानसिक आरोग्यविषयी जनजागृती होत आहे. - डॉ निकेत कासार, प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ

मानसिक आरोग्य उत्तम कसे ठेवाल?

* वाईट घटनांचा स्वीकार करणे.* माझ्याबाबतीत हे का घडले? याचा विचार न करता परिस्थितीला सामोरे जाणे.* सकारात्मक विचार करणे.* कुटुंबाला जास्तीत जास्त प्राधान्य देणे.* नव्या नव्या गोष्टी शिकण्यास प्राधान्य देणे.* स्पर्धात्मक जीवनशैलीमध्ये देखील आनंदी राहाणे.* आयुष्यात वास्तविकतेला धरून उद्दिष्ट्य निश्चित करणे.

मानसिक असंतुलनाची कारणे

* वाढत्या स्पर्धेतील ताणतणाव* पती-पत्नीमधील वारंवार होणारे वादविवाद* मोबाइलचा अतिवापर* संयमाचा अभाव

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यdoctorडॉक्टरWomenमहिलाStudentविद्यार्थीMONEYपैसाFamilyपरिवार