शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

‘बंच ऑफ थॉट्स’ पेक्षा राज्यघटनेतील विचार महत्वाचे; शरद पवारांच्या हस्ते डॉ. आंबेडकर सामाजिक संशोधन संस्थेचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 23:16 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेतील विचार महत्वाचे आहेत असं शरद पवार म्हणाले.

पुणे: अलीकडील काळात सरकारच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. तिथे ‘बंच ऑफ थॉट्स’ सारखे गोळवलकरांचे विचार असलेली पुस्तके असतात. त्यापेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेतील विचार महत्वाचे आहेत, त्यांच्या नावाच्या संशोधन संस्थेकडून हे विचार जनतेपर्यंत पोहचवले जातील असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संशोधन संस्थेचे उदघाटन पवार यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिरात झाले. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. खासदार निलेश लंके, माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ विचारवंत  प्रशांत जगताप व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पवार म्हणाले, “भारताच्या भोवतालचे सगळे देश अस्थिर असताना भारत स्थिर आहे याचे कारणच राज्यघटना हे आहे. आव्हाने  नाहीत  असे नाही. संसदेची नवी वास्तू झाली, पण त्यावर ना चर्चा झाली, ना विचारविनिमय. संसदेत संवाद होणे अपेक्षित आहे. पण डॉ. आंबेडकर यांनी लेखनातून प्रत्येक समस्येवर विचार केलेला दिसतो. कोणत्याही अडचणीच्या वेळी हे विचार मार्ग दाखवतात. त्यामुळेच सत्तेत असताना मी समग्र लेखन प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. देशाला एकसंध ठेवण्यात या विचारांचे योगदान फार मोठे आहे. शेती, वीज, अर्थ अशा प्रत्येक गोष्टीवर डॉ. बाबासाहेबांचे विचार आहेत. या केंद्राने ते जनतेपर्यंत आणावेत.”

केंद्राचे अध्यक्ष माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी प्रास्तविक केले. अरूण खोरे यांनी स्वागत केले. विजय जाधव यांनी सुत्रसंचालन केले. महात्मा फुले यांच्या अखंड गायनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.

कार्यक्रमात भारतीय संविधान: संसदीय लोकशाहीपुढील सद्य आव्हाने या विषयावर बोलताना डॉ. रावसाहेब कसबे, प्रा. डॉ. सुहास पळशीकर, ॲड. शारदा वाडेकर यांनी आपली मते व्यक्त केली. संसदीय लोकशाहीपुढे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत, त्याचा प्रतिकार करणे गरजेचे आहे, तो कसा करावा यासाठी महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या अनेक थोर नेत्यांनी मार्ग दाखवला आहे. त्यासाठी नागरिकांनीही सक्रिय व्हायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात डॉ. आढाव यांनी तोच सूर धरला. २ ऑक्टोबरला महात्मा गांधींची जयंती आहे. त्यादिवशी राज्यात, ते शक्य झाले नाही तर पुणे शहरात किमान ५ ठिकाणी देशाच्या सद्य स्थितीवर नागरिकांकडून त्यांची मते जाणून घेण्याचा उपक्रम आयोजित व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Constitution's Thoughts More Important Than 'Bunch of Thoughts': Sharad Pawar

Web Summary : Sharad Pawar inaugurated Dr. Ambedkar Social Research Institute, emphasizing the constitution's importance over ideologies in books like 'Bunch of Thoughts.' He highlighted the constitution's role in India's stability amidst global instability and urged the institute to disseminate Ambedkar's inclusive ideas on various subjects.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPuneपुणे