शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचाच अंतिम निर्णय असल्याने अर्थ खात्याची काळजी नाही : दिपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 10:22 IST

दीपक केसरकर यांनी नवीन खाते वाटपावर भाष्य केले...

पुणे : सरकारमध्ये कायमच राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खाते दिले तरी त्यांच्या निर्णयांवर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा असेल, असे अजितदादांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे अर्थ खात्याची शिवसेनेला काळजी नाही, अशा शब्दांत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नवीन खाते वाटपावर भाष्य केले.

पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या कार्यक्रमावेळी केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना मी चांदा ते बांदा ही योजना आणली. त्या योजनेचे ४०० कोटी रुपये काढून घेण्यात आले. या योजनेला अर्थखात्याकडून निधी मिळाला नाही. दादा म्हणाले की जर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले असते तर मी ही योजना बंद केली नसती; पण ठाकरे यांनी दादांना एका शब्दानेही सांगितले नाही. तेव्हा ही परिस्थिती होती. मागील सरकारमध्ये काय नाराजी होती? ही अजितदादांनी समजून घेतली आहे. अर्थमंत्री म्हणून अजितदादा सर्वांना न्याय देतील, याची खात्री आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांना वेळ देत असून, चांगले काम करत आहेत. सर्वांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी चांगले काम केले आहे. त्यामुळे तीन पक्षांचे सरकार उत्तम कारभार करेल.

सत्तार आणि राठोड यांना विचारूनच खाते बदल

मंत्री अब्दुल सत्तार यांचे कृषी खाते काढून राष्ट्रवादीला दिल्याबद्दल विचारले असता केसरकर म्हणाले, कृषिमंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांनी चांगले काम केले. शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी सत्तारांशी बोलूनच कृषी खाते राष्ट्रवादीला दिले. सत्तार यांनी होकार कळवल्यानेच हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही. संजय राठोड यांच्याशी देखील चर्चा करून खाते बदलण्यात आले. सत्तार त्यांच्या मतदारसंघात चांगल्या मतांनी निवडून आले आहेत. यापुढेही ते विजयी होतील, असे केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDipak Kesarkarदीपक केसरकरEknath Shindeएकनाथ शिंदे