शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मुख्यमंत्र्यांचाच अंतिम निर्णय असल्याने अर्थ खात्याची काळजी नाही : दिपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 10:22 IST

दीपक केसरकर यांनी नवीन खाते वाटपावर भाष्य केले...

पुणे : सरकारमध्ये कायमच राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खाते दिले तरी त्यांच्या निर्णयांवर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा असेल, असे अजितदादांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे अर्थ खात्याची शिवसेनेला काळजी नाही, अशा शब्दांत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नवीन खाते वाटपावर भाष्य केले.

पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या कार्यक्रमावेळी केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना मी चांदा ते बांदा ही योजना आणली. त्या योजनेचे ४०० कोटी रुपये काढून घेण्यात आले. या योजनेला अर्थखात्याकडून निधी मिळाला नाही. दादा म्हणाले की जर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले असते तर मी ही योजना बंद केली नसती; पण ठाकरे यांनी दादांना एका शब्दानेही सांगितले नाही. तेव्हा ही परिस्थिती होती. मागील सरकारमध्ये काय नाराजी होती? ही अजितदादांनी समजून घेतली आहे. अर्थमंत्री म्हणून अजितदादा सर्वांना न्याय देतील, याची खात्री आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांना वेळ देत असून, चांगले काम करत आहेत. सर्वांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी चांगले काम केले आहे. त्यामुळे तीन पक्षांचे सरकार उत्तम कारभार करेल.

सत्तार आणि राठोड यांना विचारूनच खाते बदल

मंत्री अब्दुल सत्तार यांचे कृषी खाते काढून राष्ट्रवादीला दिल्याबद्दल विचारले असता केसरकर म्हणाले, कृषिमंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांनी चांगले काम केले. शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी सत्तारांशी बोलूनच कृषी खाते राष्ट्रवादीला दिले. सत्तार यांनी होकार कळवल्यानेच हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही. संजय राठोड यांच्याशी देखील चर्चा करून खाते बदलण्यात आले. सत्तार त्यांच्या मतदारसंघात चांगल्या मतांनी निवडून आले आहेत. यापुढेही ते विजयी होतील, असे केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDipak Kesarkarदीपक केसरकरEknath Shindeएकनाथ शिंदे