शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

देशाला गांधींच्या विचाराची गरज; इंडियापेक्षा भारताकडे लक्ष द्यायला हवे - डाॅ. माशेलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 16:26 IST

भारताला प्रगती करायची असेल तर त्यासाठी इनाेव्हेशन वाढायला हवे

पुणे : देशाला स्वातंत्र्य मिळून नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली. आपण त्याला ‘इंडिया ७५’ असा उल्लेख करताे आणि वरवरची विकासाची दृश्ये पाहताे. पण आपण भारत ७५ असे म्हणत नाही. काेराेनानंतरच्या काळात भारतापुढे अनेक आव्हाने आहेत. त्यापैकी गरिबी हे एक आहे. म्हणून भारताला सर्वसमावेशक, वेगवान प्रगती करण्याची गरज आहे, असे विचार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या यंदाचा पुणे नेत्रसेवा राष्ट्रीय पुरस्कार हैदराबादच्या एल. व्ही. प्रसाद, आय इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गुल्लापल्ली एन. राव यांना प्रदान करण्यात आला. या वेळी डॉ. माशेलकर बाेलत हाेते. 

डाॅ. माशेलकर म्हणाले की, भारताला प्रगती करायची असेल तर त्यासाठी इनाेव्हेशन वाढायला हवे आणि ते वाढत आहे. सन २०१६ ते १७ मध्ये देशात वर्षाला एक युनिकाॅर्नची नाेंद व्हायची. आता, आठवड्याला एका युनिकाॅर्नची नाेंद हाेत आहे, ही बाब समाधानकारक आहे. त्यासाठी आपल्या आकांक्षा माेठ्या हव्यात. देशाला गांधींच्या विचाराची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. गुल्लापल्ली राव म्हणाले की, आजही देशात प्रत्येक वर्षी एक कराेड लाेक एका वेळी हाॅस्पिटलमध्ये भरती झाल्याने दारिद्र्यरेषेखाली जातात. डॉक्टरांनी रुग्णसेवेसाठी व समाजासाठी वेळ दिल्यास मोठ्या प्रमाणावर बदल घडू शकतो.

 

टॅग्स :PuneपुणेIndiaभारतMahatma Gandhiमहात्मा गांधीscienceविज्ञान