शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

पालकमंत्रिपदावरून रायगडमध्ये होणारे वाद अयोग्य; नाराजी व्यक्त करण्याची पद्धत चुकीची - रुपाली चाकणकर

By राजू इनामदार | Updated: January 20, 2025 17:35 IST

आदिती तटकरे यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी रायगडचे पालकमंत्री पद दिले. त्यावरून तिथे कोणी नाराज असेल, तर नाराजी व्यक्त करण्याची पद्धत चुकीची

पुणे : रायगडच्या पालकमंत्री पदावरून भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती.  तेसच शिवसैनिकांनी आक्रमक होत आंदोलन केले होते. अनेकांनी तर राजीनामेही दिले. हा निर्णय मला धक्कादायक वाटतो. आम्हाला ही अपेक्षा नव्हती. मी वरिष्ठांना फोन केला होता. मात्र, याबाबत माझी त्यांच्याशी काही चर्चा झालेली नाही. पालकमंत्री म्हणून माझी निवड व्हावी असं संपूर्ण रायगड जिल्ह्यात वातावरण झालेलं होतं असं म्हणत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर रुपाली चाकणकर यांनी भाष्य केलं आहे. 

पालकमंत्रिपदावरून रायगडमध्ये होत असलेले वाद अयोग्य आहेत. आदिती तटकरे यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी रायगडचे पालकमंत्री पद दिले. त्यावरून तिथे कोणी नाराज असेल, तर नाराजी व्यक्त करण्याची पद्धत चुकीची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या जिल्ह्यात अशी भाषा वापरली गेली, त्याचा मी निषेध करते, अशा शब्दांमध्ये चाकणकर यांनी आपले मत व्यक्त केले.

पक्षाच्या शिर्डी येथील दोन दिवसांच्या अधिवेशनानंतर पुण्यात आलेल्या चाकणकर यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. राज्य महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून आपण राज्यातील महिला अत्याचाराच्या सर्व घटनांची दखल घेत असते. मेळघाटमधील वृद्ध महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबत तेथील पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक झाली आहे. एक समिती स्थापन करून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल आयोगाला द्यावा असे त्यांना सांगितले आहे. अशा घटनांमुळे राज्यात महिला सुरक्षित नाही असे म्हणता येणार नाही. विरोधकांकडून असे आरोप केले जातात. पराभवामुळे त्यांना नैराश्य आले आहे, असे चाकणकर म्हणाल्या.

संजय राऊत यांचे बोलणे राज्यात कोणीही गंभीरपणे घेत नाही. त्यांनी स्वत:च्या पक्षात काय सुरू आहे ते पाहावे, अशी टीका त्यांनी केली. छगन भुजबळ, धनंजय मुंडे अधिवेशनात उपस्थित होते. ते दोघेही मोठे नेते आहेत. अधिवेशनानंतर ते काय बोलले मला माहिती नाही. त्यामुळे त्यावर मी बोलणार नाही. महायुतीमध्ये तीनही पक्षांच्या प्रमुखांमध्ये चांगला संवाद आहे. सर्व निर्णय चर्चा करूनच घेतले जातात. त्यामुळे मतभेद आहेत या म्हणण्याला काही अर्थ नाही, असा दावा चाकणकर यांनी केला. पुढील पाच वर्षांचा विचार करून पक्ष संघटनेत काही बदल करण्याचे सूतोवाच पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केले, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेRupali Chakankarरुपाली चाकणकरAditi Tatkareअदिती तटकरेRaigadरायगडMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे