शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 11:28 IST

आता ३० जूनला यादी प्रसिद्ध होणार; मागील अनुभव पाहता नवीन वेळापत्रकावर तरी विश्वास ठेवावा कसा? असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना पडला आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा दहा दिवस आधी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला. त्यामुळे पुढील प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण हाेणार, म्हणून पालक आणि विद्यार्थी समाधान व्यक्त करत हाेते. पण, अकरावी प्रवेश प्रक्रियेत वारंवार हाेणाऱ्या विलंबामुळे आनंदावर विरजण पडले आहे.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पुन्हा तांत्रिक अडचणीत अडकली असून, पहिली निवड यादी जाहीर होण्यास पुन्हा चार दिवस विलंब होत आहे. ही यादी सोमवारी (दि. ३०) जाहीर होईल, असे सांगितले जात आहे. याबद्दल विद्यार्थी - पालक यांच्यासह अभ्यासक्रम वेळेत कसा पूर्ण करायचा या चिंतेमुळे कॉलेजांकडूनही नाराजी व्यक्त होत आहे.

नव्या वेळापत्रकावर तरी विश्वास ठेवावा कसा? विद्यार्थांना पडला प्रश्न

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी वापरल्या जात असलेल्या सॉफ्टवेअरमध्ये महाविद्यालयाचा कट ऑफ दिसत नसल्याने प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्यास उशीर होत आहे. 

परिणामी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही नव्याने प्रसिद्ध करावे लागले आहे. पण, मागील अनुभव पाहता नवीन वेळापत्रकावर तरी विश्वास ठेवावा कसा? असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना पडला आहे. अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाचा गोंधळ कधी संपणार? असा प्रश्न पडला आहे. 

प्रवेशासाठीही ‘तारीख पे तारीख?’

अकरावी प्रवेशाबाबत यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे संबंधित एजन्सीला ऑनलाइन प्रक्रिया राबविणे शक्य होत नाही का? अशी शंका निर्माण होत आहे. 

त्यात आता शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाचे नवे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात ३० जूनला गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगितले आहे. परंतु, ३० जून ही तारीख तरी पाळली जाणार का? हे पाहावे लागणार आहे.

टॅग्स :Admissionप्रवेश प्रक्रियाStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयEducationशिक्षण