शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

‘अवकाळी’चा मोठा फटका! २१ जिल्ह्यांतील तब्बल ६ हजार ६६१ हेक्टरवरील पिके जमीनदाेस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 09:07 IST

सर्वाधिक १ हजार ७२२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान गोंदिया जिल्ह्यात झाले आहे....

पुणे : राज्यात गेल्या आठवड्यावर सुरू असलेल्या पूर्व मोसमी पावसामुळे २१ जिल्ह्यांमध्ये ६ हजार ६६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यात मुख्यत्वे फळपीके, भाजीपाला व उन्हाळी पिकांचा समावेश आहे. सर्वाधिक १ हजार ७२२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान गोंदिया जिल्ह्यात झाले आहे.

मॉन्सून अंदमानात दाखल झाला असून, राज्यातही पूर्व मोसमी पावसाने अनेक जिल्ह्यांत धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांचे फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा फटका राज्यातील २१ जिल्ह्यांमधील शेती पिकांना बसला आहे. कोकणातील आंबा, केळी, काजू, भात, नारळ, फणस तसेच भाजीपाला पिकांना बसला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये केळी, भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब, कांदा, मका, बाजरी अशा पिकांना याचा फटका बसला आहे, तर पुणे, सांगली, नगर या जिल्ह्यांमध्ये भाजीपाला तसेच फळपिकांचे माेठे नुकसान झाले. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अवकाळीने कहर केला असून, उन्हाळी भातासह भाजीपाला व लिंबू, संत्रा या पिकांचे नुकसान झाले आहे.

राज्यातील २१ जिल्ह्यांमधील ६ हजार ६१६ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक १ हजार ७२२ हेक्टरी पिकांचे नुकसान गोंदिया जिल्ह्यात झाले आहे. त्या खालोखाल भंडारा जिल्ह्यात १ हजार ५२० हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये ५१४, अकोला जिल्ह्यात ५०३, तर रायगडमध्ये ४५३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक नजर अंदाज अहवाल कृषी विभागाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचवा व अंतिम टप्पा सोमवारी पार पडला असून, राज्यातील अन्य भागांमध्ये महसूल व कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी पंचनामे करण्यात गुंतले आहेत.

जिल्हानिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)

ठाणे : १०७

पालघर : ३७३

रत्नागिरी : २६

रायगड : ४५३

सिंधुदुर्ग : २१

धुळे : ७२

नाशिक : ५१४

नंदुरबार : १२३

जाळगाव : ३०

पुणे : १७४

नगर : २९९

सांगली : ९

भंडारा : १५२०

नागपूर : २१

गोंदिया : १७२२

चंद्रपूर : १७७

बुलढाणा : ३०

अकोला : ५०३

वाशिम : १

अमरावती : ३८८

यवतमाळ : ५१

एकूण : ६,६१६

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड