शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्यातील ४४,५०९ महसुली गावांची ओळख त्रिस्तरीय, गाव घोषित करण्यापूर्वी होणार ऑनलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 08:27 IST

Pune: राज्यातील नवीन गावे जाहीर करण्यापूर्वी आता त्यांचा कारभार ऑनलाईन होणार आहे. त्यासाठी जमाबंदी आयुक्तांच्या परवानगीनंतरच जिल्हाधिकारी जमीन महसूल कायद्यानुसार नावे जाहीर करू शकतील.

- नितीन चौधरीपुणे : राज्यातील नवीन गावे जाहीर करण्यापूर्वी आता त्यांचा कारभार ऑनलाईन होणार आहे. त्यासाठी जमाबंदी आयुक्तांच्या परवानगीनंतरच जिल्हाधिकारी जमीन महसूल कायद्यानुसार नावे जाहीर करू शकतील.

जमाबंदी आयुक्तालयाने आतापर्यंत राज्यात ४४ हजार ५०९ गावे असल्याचे जाहीर केले असून, या सर्व गावांना स्थानिक सरकार सांकेतांक अर्थात लोकल गव्हर्न्मेंट कोड (एलजीडी) देण्यात आला आहे. या कोडसह मतदारसंघ कोड व लोकसंख्या कोडही देण्यात येणार आहे. '

अशा त्रिस्तरीय सांकेतांकाने गावाची ओळख निर्माण होणार आहे. याचा फायदा सरकारी योजना, सर्वेक्षण, वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये होणार असून महसुली कामात पारदर्शीपणा येणार आहे.गावे करणार ऑनलाईनज्या गावांमध्ये सातबारा अस्तित्वात आहे, अशा गावांनाच स्वतंत्र ‘एलजीडी कोड’ देण्यात आला आहे. त्यानुसार ४४ हजार ५०९ गावे निश्चित करण्यात आली असून, त्या गावांना सांकेतांकानुसार नवी ओळख देण्यात आली आहे, अशी माहिती ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली. राज्य सरकारने आता जमाबंदी आयुक्तांना आता नवीन गावांच्या घोषणेसाठी प्राधिकृत केले आहे.

असा असेल फायदालोकसंख्यानिहाय स्तरावरील कोडमुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. तसेच अन्नधान्य वितरण, वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील बनावट व्यक्ती अपात्र म्हणून ओळखता येणार आहेत. तसेच कृषी व पशू गणनाही सोपी होणार आहे. या कोडमुळे मतदार यादीभाग करण्यासाठीही त्याचा उपयोग होणार आहे. यातून बनावट मतदार काढून टाकण्यासाठी होणार आहे.

सध्या राज्यातून नव्या ४० गावांचे प्रस्ताव आले आहेत. त्यासाठीची वाडी विभाजन प्रक्रिया करण्याचे काम सुरू असून या गावांची घोषणा केल्यानंतर राज्यात गावांची संख्या ४४ हजार ५५० पर्यंत संख्या जाईल.- सरिता नरके, राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र