शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामा हल्ल्यातील संशयित दहशतवाद्याला चाकणमधून अटक, बिहार एटीएसची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 19:35 IST

चाकण एमआयडीसीतील वासुली फाटा ( ता. खेड ) येथून शरियत मंडल ( पूर्ण नाव नाही ) या पश्चिम बंगालमधील १९ वर्षीय दहशतवादी तरुणास अटक करण्यात आली आहे.

चाकण : पुलवामा हल्ल्यानंतर जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची प्रिंट जवळ बाळगणाऱ्या संशयित दहशतवाद्यांच्या साथीदारास पुण्यातील चाकण जवळील खालूंब्रे ( ता.खेड ) येथून बिहार एटीएसने अटक केली आहे. शरियत अन्वरहूलहक मंडल ( रा. बाजीपूर, ता. गंजा, जि. नादिया, प. बंगाल ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. शरियत हा बांधकाम मजूर म्हणून काम करीत होता. बिहारमधील पाटणा जंक्शन येथे एटीएसने खैरूल मंडल आणि अबू सुलतान या दोघा बांगलादेशींना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यांच्या चौकशीमध्ये शरियतचे नाव पुढे आले. त्यानंतर बिहार एटीएसने पुणे एटीएसच्या मदतीने चाकण पट्ट्यात छापा मारून शरियत याला अटक केली. त्याच्यावर बिहार मध्ये दिनांक २४ मार्च २०१९ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक १/२०१९, अंडर सेक्शन १८, ३८ युएपीए, भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ सह फॉरेन ऍक्ट १४ अन्वये गुन्हा दाखल आहे. 

पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. खैरूल मंडल आणि अबू सुलतान या दोघांकडे सीआरपीएफ जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची प्रिंट आढळून आली होती. तसेच इतर अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडली. यामुळे देशातील तपास यंत्रणा देखील चक्रावून गेल्या आहेत. 

खैरूल मंडल आणि अबू सुलतान या दोघांच्या चौकशीत शरियत याचे नाव पुढे आले. हे तिघे जण इस्लामिक स्टेट ऑफ बांगलादेश ( आय एस बी डी )आणि आयसिस सह जमात-उल-मुजाहिद्दीन ( जेएमबी ) या दहशतवादी संघटनेचे सक्रीय सदस्य आहेत. 

दिल्ली, मुंबई आणि गोव्यात दहशतवादी हल्ले घडवण्याची या दहशतवादी संघटनांची योजना असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यामुळे मुंबई, दिल्ली आणि गोव्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली, मुंबई आणि गोव्यातील धर्मस्थळांवर दहशतवादी हल्ला करण्याचा दहशतवादी संघटनांचा कट आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. 

पुलवामा येथे स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या ताफ्यावर आदळवून दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर भारतानं पाकमध्ये घुसून एअर स्ट्राइक करत २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. 

टॅग्स :Puneपुणेpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद