शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

ऐतिहासिक पुस्तकांकडे तरुणाईचा ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:09 IST

नम्रता फडणीस लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘इतिहासाविषयीचे कमालीचे आकर्षण... कुतूहल... जिज्ञासा आणि संशोधक वृत्तीमुळे तरुण पिढीचा ओढा इतिहासाकडे ...

नम्रता फडणीस

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘इतिहासाविषयीचे कमालीचे आकर्षण... कुतूहल... जिज्ञासा आणि संशोधक वृत्तीमुळे तरुण पिढीचा ओढा इतिहासाकडे वाढू लागला आहे. त्यामुळे शहरातील पुस्तक विक्रेत्यांकडे अगदी राजा शिवछत्रपती यांच्यापासून ते स्वामी, मृत्युंजय, राधेय यांसारख्या विविध ऐतिहासिक पुस्तकांविषयीची मागणी वाढू लागली आहे. विशेषत: सोशल मीडियावर इतिहासाविषयी अनेकदा माहितीअभावी उथळ चर्चांना पेव फुटत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, इतिहासाचे अचूक संदर्भ जाणून घेण्याकरिता पुस्तक वाचनाकडे कल वाढतोय, ही चांगली बाब आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील ऐतिहासिक घडामोडींचा जाज्वल्य इतिहास चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा एक ट्रेंड सुरू झाला आहे. चित्रपटांमुळे खरं तर इतिहासाची पाळंमुळं जाणून घेण्याची नव्याने उत्सुकता तरुणाईमध्ये निर्माण झाली असल्याचे सांगितले जाते. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड केली जाते. मात्र, खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर पुस्तकांशिवाय पर्याय नाही याची जाणीव झाल्याने तरुणाईचा कल ऐतिहासिक पुस्तकांकडे वाढला असल्याचे पुस्तक विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

------------------------------------

जुन्या साहित्याला मागणी वाढली आहे. त्याबरोबरच तरुणाईकडून ऐतिहासिक पुस्तकांना विशेष पसंती आहे. राजा शिवछत्रपती, मृत्युंजय या पुस्तकांना ऑनलाइन मागणी आहे. इतिहासाविषयीची कमालीची उत्सुकता हे यामागील प्रमुख कारण असू शकते. अनेक ऐतिहासिक पुस्तकांसाठी तरुणाईकडून विचारणा केली जात आहे.

- रमेश राठिवडेकर, अक्षरधारा बुक गॅलरी

--------------------------------------

इतिहास हा सर्वांच्याच कुतूहलाचा विषय आहे. एखादा चित्रपट किंवा मालिका आली की त्या ऐतिहासिक विषयाचे संदर्भ जाणून घेण्यासाठी तरुणांकडून त्या संबंधित पुस्तकाची मागणी वाढते. त्यामुळे ऐतिहासिक पुस्तकांना मागणी ही वाढतच असते, ती कमी झालेली नाही.

- नीलेश भार्गव, पुस्तक विक्रेता

----------------------------

तरुणांना इतिहास या विषयाची आवड खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ती पूर्वीही होती. फक्त त्यावेळी फारशी साधन उपलब्ध नव्हती. सोशल मीडिया नसल्याने चर्चेला फारसा वाव नव्हता. आजच्या काळाला अनुरूप नव्या साधनांमधून तरुण आवड जपू पाहात आहेत. ही चांगली गोष्ट आहे. त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास हा वैभवशाली असून, तो गोडी लावणारा आहे. इतिहासाविषयी चर्चा करणे, संशोधक वृत्ती आणि जिज्ञासा असणे ही सकारात्मक बाब आहे.

- प्रसाद तारे, इतिहास अभ्यासक

--------------------------------