शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक पुस्तकांकडे तरुणाईचा ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:09 IST

नम्रता फडणीस लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘इतिहासाविषयीचे कमालीचे आकर्षण... कुतूहल... जिज्ञासा आणि संशोधक वृत्तीमुळे तरुण पिढीचा ओढा इतिहासाकडे ...

नम्रता फडणीस

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘इतिहासाविषयीचे कमालीचे आकर्षण... कुतूहल... जिज्ञासा आणि संशोधक वृत्तीमुळे तरुण पिढीचा ओढा इतिहासाकडे वाढू लागला आहे. त्यामुळे शहरातील पुस्तक विक्रेत्यांकडे अगदी राजा शिवछत्रपती यांच्यापासून ते स्वामी, मृत्युंजय, राधेय यांसारख्या विविध ऐतिहासिक पुस्तकांविषयीची मागणी वाढू लागली आहे. विशेषत: सोशल मीडियावर इतिहासाविषयी अनेकदा माहितीअभावी उथळ चर्चांना पेव फुटत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, इतिहासाचे अचूक संदर्भ जाणून घेण्याकरिता पुस्तक वाचनाकडे कल वाढतोय, ही चांगली बाब आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील ऐतिहासिक घडामोडींचा जाज्वल्य इतिहास चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा एक ट्रेंड सुरू झाला आहे. चित्रपटांमुळे खरं तर इतिहासाची पाळंमुळं जाणून घेण्याची नव्याने उत्सुकता तरुणाईमध्ये निर्माण झाली असल्याचे सांगितले जाते. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड केली जाते. मात्र, खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर पुस्तकांशिवाय पर्याय नाही याची जाणीव झाल्याने तरुणाईचा कल ऐतिहासिक पुस्तकांकडे वाढला असल्याचे पुस्तक विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

------------------------------------

जुन्या साहित्याला मागणी वाढली आहे. त्याबरोबरच तरुणाईकडून ऐतिहासिक पुस्तकांना विशेष पसंती आहे. राजा शिवछत्रपती, मृत्युंजय या पुस्तकांना ऑनलाइन मागणी आहे. इतिहासाविषयीची कमालीची उत्सुकता हे यामागील प्रमुख कारण असू शकते. अनेक ऐतिहासिक पुस्तकांसाठी तरुणाईकडून विचारणा केली जात आहे.

- रमेश राठिवडेकर, अक्षरधारा बुक गॅलरी

--------------------------------------

इतिहास हा सर्वांच्याच कुतूहलाचा विषय आहे. एखादा चित्रपट किंवा मालिका आली की त्या ऐतिहासिक विषयाचे संदर्भ जाणून घेण्यासाठी तरुणांकडून त्या संबंधित पुस्तकाची मागणी वाढते. त्यामुळे ऐतिहासिक पुस्तकांना मागणी ही वाढतच असते, ती कमी झालेली नाही.

- नीलेश भार्गव, पुस्तक विक्रेता

----------------------------

तरुणांना इतिहास या विषयाची आवड खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ती पूर्वीही होती. फक्त त्यावेळी फारशी साधन उपलब्ध नव्हती. सोशल मीडिया नसल्याने चर्चेला फारसा वाव नव्हता. आजच्या काळाला अनुरूप नव्या साधनांमधून तरुण आवड जपू पाहात आहेत. ही चांगली गोष्ट आहे. त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास हा वैभवशाली असून, तो गोडी लावणारा आहे. इतिहासाविषयी चर्चा करणे, संशोधक वृत्ती आणि जिज्ञासा असणे ही सकारात्मक बाब आहे.

- प्रसाद तारे, इतिहास अभ्यासक

--------------------------------