शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

टेंभूर्णी ते लातूर रस्ता अडकला लालफितीत : मार्ग पूर्ण झाल्यास वेळ आणि पैसे वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 11:52 IST

मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा महत्त्वाचा रस्त्या म्हणून टेंभूर्णी ते लातूर रस्त्याच्या प्रस्ताव तयार करण्यात आला.

ठळक मुद्देकेंद्र शासनाकडे रस्त्याच्या मंजूरीचा प्रस्ताव तीन वर्षांपूर्वी आला पाठवण्यात रस्त्याच्या कामास लवकरच सुरू होईल , नितीन गडकरी यांचे आश्वासन

पुणे: मराठवाड्यातून लहान मोठ्या कामासाठी पुण्यात येणा-या मजूरांना अहमदनगर मार्गे किंवा सोलापूर मार्गे लांबचा प्रवास करावा लागतो. मात्र, टेंभूर्णी ते लातूर मार्ग पूर्ण झाल्यास या मजूरांचा वेळ आणि पैसे वाचणार आहेत. परंतु, सुमारे तीन वर्षांपासून या रस्त्याची फाईल केंद्र शासनाकडे पडून आहे. रस्त्याच्या अंतिम मंजूरीची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात कामाला सुरूवात व्हावी,यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिका-यांना केंद्राकडे खेटे मारावे लागत आहेत.मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा महत्त्वाचा रस्त्या म्हणून टेंभूर्णी ते लातूर रस्त्याच्या प्रस्ताव तयार करण्यात आला. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे या रस्त्याच्या मंजूरीचा प्रस्ताव तीन वर्षांपूर्वी पाठविण्यात आला. परंतु, गेल्या तीन वर्षात या रस्त्याच्या मंजूरीबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणातून अनेक वेळा या रस्त्याच्या कामास लवकरच सुरूवात केली जाईल, असे आश्वासन दिले. परंतु, अद्याप या रस्त्याच्या कामाला गती मिळालेली नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मराठवाड्यातून पुणे व परिसरात येणा-या दुष्काळग्रस्तांना सुमारे शंभर किलो मिटरचा अधिकचा प्रवास करून यावे लागत आहेत, असे एमएसआरडीसीच्या अधिका-यांनी सांगितले.टेंभूर्णी ते लातूर हा सुमारे 165 कि.मि.चा रस्ता तीन जिल्ह्यातून जाणार आहे.त्यासाठी अकराशे कोटी रुपये प्रस्तावित केले आहे. वर्षातील सुमारे पाच महिने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर मजूरांची वाहतूक होत असते. बीड, लातूर आदी भागातून कारखान्यासाठी मोठ्या प्रमाणावर मजूर याच रस्त्याने पुण्याकडे ये-जा करतात. त्यामुळे टेंभूर्णी ते लातूर रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. सातारा- म्हसवड - टेंभूर्णी - कुरूडवाडी - बार्शी - लातूर असा हा रस्ता प्रस्तावित केला आहे. सोलापूरसाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे. सत्ताधारी राजकीय नेत्यांनी या रस्त्याचा उल्लेख आपल्या भाषणांमधून अनेक वेळा केला. परंतु,रस्त्याच्या कामास प्रत्यक्षात सुरूवात व्हावी,यासाठी कोणीही प्रयत्न केले नाही,असेही एमएसआरडीसीच्या अधिका-यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेlaturलातूरSolapurसोलापूरroad transportरस्ते वाहतूकNitin Gadkariनितीन गडकरी