शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

"आपल्या सभोवतालच्या घटना चित्रपटातून मांडा", दिग्दर्शिका मीरा नायर यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 20:35 IST

चित्रपट निर्मिती हा माझ्यासाठी एक आजार असल्यासारखे आहे. तो काही केल्या सुटत नाही.

ठळक मुद्देसौंदर्य आणि वास्तव याचा कलेमध्ये समावेश करून पुढील वाटचाल करा, विद्यार्थ्यांना सल्ला

पुणे : आपल्या सभोवती जे घडते किंवा आपण जे अनुभवतो तीच कथा चित्रपटात मांडायला हवी. कारण वास्तव मांडायला धाडस लागते. आपण स्वत:ची कथा सांगितली नाही तर ती कुणीही सांगणार नाही. सत्य हे काल्पनिकतेपेक्षा प्रभावी असते, असे मत ’वॉटर’, ‘मान्सून वेडिंग’ चित्रपटाच्या दिग्दर्शिक मीरा नायर यांनी व्यक्त केले. ‘चित्रपट निर्मिती हा माझ्यासाठी एक आजार असल्यासारखे आहे. तो काही केल्या सुटत नाही. माझ टोपण नाव म्हणूनच ‘मँड गर्ल’ असे आहे. काहीतरी वेगळं करण्यासाठी वेडच असावं लागते असेही त्या म्हणाल्या.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूचा २३ वा पदवीप्रदान सोहळा मंगळवारी ऑनलाइन माध्यमातून पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. 

''वडील प्रशासकीय अधिकारी होते. त्यांच्या नोकरीच्या निमित्ताने विविध प्रांत,तेथील संस्कृती, विविधता जवळून अनुभवायला मिळाली. जत्रांमधून प्राचीन कथा कानावर पडत गेल्या. त्याची राजकीय बाजू देखील उमगत गेली. सत्यजित रे आणि ऋत्विक घटक यांचे चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटांकडे पाहाण्याची दृष्टी विकसित होत गेली, असे सांगून मीरा नायर म्हणाल्या, मला देशाचा सांस्कृतिक दूत व्हायचे नव्हते ना मला टिपीकल बॉलिवूडसारखे चित्रपट करायचे होते. मला स्वत:चे वेगळे असे काहीतरी मांडायचे होते. त्यामुळे बॉलिवूडसाठी मी बाहेरची होते. ‘धोबी का कुत्ता ना घरका ना घटका’ अशी माझी स्थिती होती. ‘सलाम बॉम्बे’ चित्रपटात रस्त्यावरील मुलांचे जगणे, त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. कला जग बदलू शकते का? असा प्रश्न पडल्यानंतर त्याचे उत्तर ‘हो’ असे मिळाले. चित्रपटाच्या निमित्ताने एक फौंडेशन उभी राहिली आणि शासनाने रस्त्यावरील मुलांच्या पुनर्वसनासाठी धोरण आखले. तेव्हा चित्रपट हे प्रभावी माध्यम असल्याची ख-या अर्थाने जाणीव झाली.

सौंदर्य आणि वास्तव याचा कलेमध्ये समावेश करा 

''गेल्या ४० वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये तीन गोष्टी आवर्जून शिकले. जे काम हाती घ्यायचे ते तडीस नेले पाहिजे. चित्रपटाच्या कथानकासाठी कुणाकडूनही अगदी वॉचमनसारख्या व्यक्तींकडूनही प्रेरणा मिळू शकते. केवळ स्वत:ची दृष्टी विकसित करून बुद्धधीचा वापर करायला हवा आणि कलाविश्व समृद्ध करायला हवे असे सांगत नायर यांनी सौंदर्य आणि वास्तव याचा कलेमध्ये समावेश करून पुढील वाटचाल करा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.''

टॅग्स :Puneपुणेartकलाcinemaसिनेमा