शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

"आपल्या सभोवतालच्या घटना चित्रपटातून मांडा", दिग्दर्शिका मीरा नायर यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 20:35 IST

चित्रपट निर्मिती हा माझ्यासाठी एक आजार असल्यासारखे आहे. तो काही केल्या सुटत नाही.

ठळक मुद्देसौंदर्य आणि वास्तव याचा कलेमध्ये समावेश करून पुढील वाटचाल करा, विद्यार्थ्यांना सल्ला

पुणे : आपल्या सभोवती जे घडते किंवा आपण जे अनुभवतो तीच कथा चित्रपटात मांडायला हवी. कारण वास्तव मांडायला धाडस लागते. आपण स्वत:ची कथा सांगितली नाही तर ती कुणीही सांगणार नाही. सत्य हे काल्पनिकतेपेक्षा प्रभावी असते, असे मत ’वॉटर’, ‘मान्सून वेडिंग’ चित्रपटाच्या दिग्दर्शिक मीरा नायर यांनी व्यक्त केले. ‘चित्रपट निर्मिती हा माझ्यासाठी एक आजार असल्यासारखे आहे. तो काही केल्या सुटत नाही. माझ टोपण नाव म्हणूनच ‘मँड गर्ल’ असे आहे. काहीतरी वेगळं करण्यासाठी वेडच असावं लागते असेही त्या म्हणाल्या.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूचा २३ वा पदवीप्रदान सोहळा मंगळवारी ऑनलाइन माध्यमातून पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. 

''वडील प्रशासकीय अधिकारी होते. त्यांच्या नोकरीच्या निमित्ताने विविध प्रांत,तेथील संस्कृती, विविधता जवळून अनुभवायला मिळाली. जत्रांमधून प्राचीन कथा कानावर पडत गेल्या. त्याची राजकीय बाजू देखील उमगत गेली. सत्यजित रे आणि ऋत्विक घटक यांचे चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटांकडे पाहाण्याची दृष्टी विकसित होत गेली, असे सांगून मीरा नायर म्हणाल्या, मला देशाचा सांस्कृतिक दूत व्हायचे नव्हते ना मला टिपीकल बॉलिवूडसारखे चित्रपट करायचे होते. मला स्वत:चे वेगळे असे काहीतरी मांडायचे होते. त्यामुळे बॉलिवूडसाठी मी बाहेरची होते. ‘धोबी का कुत्ता ना घरका ना घटका’ अशी माझी स्थिती होती. ‘सलाम बॉम्बे’ चित्रपटात रस्त्यावरील मुलांचे जगणे, त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. कला जग बदलू शकते का? असा प्रश्न पडल्यानंतर त्याचे उत्तर ‘हो’ असे मिळाले. चित्रपटाच्या निमित्ताने एक फौंडेशन उभी राहिली आणि शासनाने रस्त्यावरील मुलांच्या पुनर्वसनासाठी धोरण आखले. तेव्हा चित्रपट हे प्रभावी माध्यम असल्याची ख-या अर्थाने जाणीव झाली.

सौंदर्य आणि वास्तव याचा कलेमध्ये समावेश करा 

''गेल्या ४० वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये तीन गोष्टी आवर्जून शिकले. जे काम हाती घ्यायचे ते तडीस नेले पाहिजे. चित्रपटाच्या कथानकासाठी कुणाकडूनही अगदी वॉचमनसारख्या व्यक्तींकडूनही प्रेरणा मिळू शकते. केवळ स्वत:ची दृष्टी विकसित करून बुद्धधीचा वापर करायला हवा आणि कलाविश्व समृद्ध करायला हवे असे सांगत नायर यांनी सौंदर्य आणि वास्तव याचा कलेमध्ये समावेश करून पुढील वाटचाल करा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.''

टॅग्स :Puneपुणेartकलाcinemaसिनेमा