शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

टाटा पुण्याचा पाणी प्रश्न सोडवणार; स्वत:च्या ८० टक्के जमिनीवर 'पाणी' सोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 12:48 IST

यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच टाटा कंपनी व राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले...

पुणे : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता टाटा कंपनीच्या मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही आहेत. यासंदर्भात आता टाटा कंपनीनेही सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. धरणाची उंची वाढवून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त पाण्यातून ही गरज पूर्ण करता येणे शक्य असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच टाटा कंपनी व राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी मुळशी धरण टप्पा एक व दोनमधील पिण्याच्या पाण्यासंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. यावेळी टाटा कंपनी, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त आदी अधिकारी उपस्थित होते.

मुळशी धरणाच्या टप्पा एकमध्ये धरणाची उंची एक मीटरने वाढविण्यास टाटा कंपनीने तत्त्वतः होकार दर्शवला आहे. याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडून टाटा कंपनीला सादर करण्यात येणार आहे. धरणाची उंची वाढवल्यानंतर निर्माण होणाऱ्या पाण्याच्या फुगवट्यामुळे काही जमीन पाण्याखाली जाणार आहे. यातील ८० टक्के जमीन ही टाटा कंपनीच्या मालकीची असून, उर्वरित २० टक्के जमीन शेतकऱ्यांची आहे. ही जमीन संपादित करण्यासाठी राज्य सरकार मदत करेल, असे आश्वासन पवार यांनी टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.

याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिले. या निर्णयामुळे धरणाची क्षमता वाढल्यानंतर निर्माण होणारे अतिरिक्त पाणी पुणे शहराला मिळण्याची शक्यता वाढली आहे.

धरणाशेजारील ५० गावांनाही पाणी :

मुळशी धरणाच्या दुसऱ्या टप्प्यात धरणाशेजारील ५० गावांच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. याबाबत पवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. कंपनीच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. त्यामुळे कंपनीने या ५० गावांना पाणी देण्याचे मान्य केले आहे.

टॅग्स :DamधरणPuneपुणेTataटाटा