शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
3
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
4
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
5
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
6
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
7
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
8
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
9
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
10
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
11
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
12
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
13
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
14
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
15
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा
16
बाबा 1 कोटी रुपये द्या, तरच...! 12 वर्षांच्या मुलीची सर्वोच्च न्यायालयात अजबच मागणी, CJI गवईंनी आईलाच सुनावलं!
17
एका खोलीतून सुरू झालेली कंपनी चीनसोबत करणार कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय! शेअर्सने दिला १०००% परतावा
18
जागतिक IVF दिन: IVF हा जोडप्यांसाठी आशेचा किरण; पण 'या' चुकांमुळे पदरी पडते निराशा!
19
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
20
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?

टाटा पुण्याचा पाणी प्रश्न सोडवणार; स्वत:च्या ८० टक्के जमिनीवर 'पाणी' सोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 12:48 IST

यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच टाटा कंपनी व राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले...

पुणे : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता टाटा कंपनीच्या मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही आहेत. यासंदर्भात आता टाटा कंपनीनेही सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. धरणाची उंची वाढवून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त पाण्यातून ही गरज पूर्ण करता येणे शक्य असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच टाटा कंपनी व राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी मुळशी धरण टप्पा एक व दोनमधील पिण्याच्या पाण्यासंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. यावेळी टाटा कंपनी, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त आदी अधिकारी उपस्थित होते.

मुळशी धरणाच्या टप्पा एकमध्ये धरणाची उंची एक मीटरने वाढविण्यास टाटा कंपनीने तत्त्वतः होकार दर्शवला आहे. याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडून टाटा कंपनीला सादर करण्यात येणार आहे. धरणाची उंची वाढवल्यानंतर निर्माण होणाऱ्या पाण्याच्या फुगवट्यामुळे काही जमीन पाण्याखाली जाणार आहे. यातील ८० टक्के जमीन ही टाटा कंपनीच्या मालकीची असून, उर्वरित २० टक्के जमीन शेतकऱ्यांची आहे. ही जमीन संपादित करण्यासाठी राज्य सरकार मदत करेल, असे आश्वासन पवार यांनी टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.

याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिले. या निर्णयामुळे धरणाची क्षमता वाढल्यानंतर निर्माण होणारे अतिरिक्त पाणी पुणे शहराला मिळण्याची शक्यता वाढली आहे.

धरणाशेजारील ५० गावांनाही पाणी :

मुळशी धरणाच्या दुसऱ्या टप्प्यात धरणाशेजारील ५० गावांच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. याबाबत पवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. कंपनीच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. त्यामुळे कंपनीने या ५० गावांना पाणी देण्याचे मान्य केले आहे.

टॅग्स :DamधरणPuneपुणेTataटाटा