शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

कोर्ट ऑफिसर होताय पक्षकारांचे टार्गेट :गेल्या ४० दिवसांत २ वकिलांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 12:28 IST

भांडण कोणत्याही प्रकारचे असो. त्यावर तुला न्यायालयात बघून घेतो असे सांगत अन्याय झालेली व्यक्ती दावा दाखल करते.

ठळक मुद्देसंरक्षण कायदा मंजूर झाल्यास वकिलांवर हल्ला करणाऱ्यांना वचक बसण्याची शक्यता

पुणे : भांडण कोणत्याही प्रकारचे असो. त्यावर तुला न्यायालयात बघून घेतो असे सांगत अन्याय झालेली व्यक्ती दावा दाखल करते. नागरिकांचा न्याय पालिकेवर असलेला विश्वास त्यातून स्पष्ट होतो. या प्रक्रियेत वकील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, सध्या तुला बघुन घेतो हे वाक्य वकिलांनाच वापरले जात असून त्यातून त्यांच्यावर होणारे हल्ले देखील वाढले आहेत.     ऑफिसर ऑफ दी कोर्ट असणारे वकील न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांमध्ये कायद्याचा अभ्यास करून पक्षकारांची बाजू मांडतात. युक्तिवादादरम्यान विरुद्ध पक्षाचे मुद्दे खोडून काढतात आरोप-प्रत्यारोपाच्याफैरी झडल्या जातात. सर्व प्रयत्न केल्यानंतरी काही अपेक्षित निकाल न लागल्याने तसेच विरुद्ध पक्षाच्या वकिलांने केलेल्या युक्तीवादामुळे रागावलेला पक्षकार थेट वकिलांनाच धमकी देत आहे. एवढेच नाही तर वकिलांवर जीवघेणा हल्ला केल्याच्या घटना देखील पुण्यात घडल्या आहेत. त्यामुळे वकील सुरक्षित आहेत का अशा प्रश्न उपस्थित झाला आहे. वकिलांवर वारंवार होणाऱ्या हल्यांमुळे वकील संरक्षण कायदा करण्यात यावा, अशी मागणी वकिलांकडून गेली अनेक वर्ष करण्यात येत होती. दरम्यान वकिलांची ही मागणी विचारात घेवून केंद्रीय कायदा विभागाने वकिलांसाठी संरक्षण कायद्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांडण्यात येणार आहे. हा कायदा मंजूर झाल्यास वकिलांवर हल्ला करणाऱ्यांना वचक बसण्याची शक्यता आहे. २२ क्टोंबर रोजी रात्री संगमवाडी ब्रीजवरून जात असलेले अ‍ॅड. देवानंद ढोकणे (वय ४२, रा. येरवडा) यांच्यावर दोघांनी गोळीबार करत प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर २० डिसेंबर रोजी अ‍ॅड. संदीप फडके यांच्यावर एरंडवणे येथे हल्ला करण्यात आला. त्यात ते जखमी झाले आहेत. त्यापुर्वी कौटुंबिक न्यायालयात देखील कामकाज सुरू असताना पक्षकारांकडून वकिलांना मारहाण करण्यात आली होती. ................वकिलांवर होणारे हल्ले न्यायपालिकेच्या दृष्टीने चांगले नाही. त्यामुळे त्यांना संरक्षण मिळालेच पाहिजे. तसेच हल्लेखोरांना शिक्षा देण्यासाठी कालबद्ध पद्धतीने खटला चालावा. खटला मार्गी लागण्यासाठी झालेल्या उशीरास आपले किंवा विरु द्ध पक्षाचे वकील जबाबदार आहेत, अशी समजूत झाली त्याचा उद्रेक हल्ल्यांच्या माध्यमातून होतो. या सर्व प्रकारांमुळे वकिलांनी देखील आत्मपरीक्षण करावे. खटले लवकर निकाली लागण्यासाठी प्रयत्न करावे. त्यातून हल्ले थांबण्याची शक्यता आहे. - अ‍ॅड. एस. के. जैन, ज्येष्ठ विधिज्ञ.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयadvocateवकिल