शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तळेगावचा ऊस निघाला दुबईला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 06:59 IST

आत्तापर्यंत तीन शेतकऱ्यांचा २०० टन ऊस दुबईला रवाना

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे विठ्ठलवाडी परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस आता दुबईला रवाना होऊ लागला आहे.सध्याच्या मंदीच्या काळातही शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी परिसरातील प्रगतिशील शेतकरी सोपान गणपतराव गवारी, जालिंदर भाऊसाहेब ढमढेरे व विजय काळूराम शिंदे या तीन शेतकºयांचा २०० टन ऊस आत्तापर्यंत दुबईला रवाना केलेला आहे. सध्या मंदीचे वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या उसाला टनाला २ हजार ५५० रुपये भाव दिला जात असून, परिसरात इतर व्यापाºयांच्या तुलनेत हा बाजारभाव चांगला मिळत असल्याने शेतकरीवर्ग आनंदी आहे. शिरूर तालुक्यातील शेतकºयांच्या शेतातील ऊस रसवंतीसाठी प्रथमच थेट दुबईला जात आहे. शेतकºयांच्या उसाची गुणवत्ता पाहूनच उसाची निवड करून हा ऊस दुबईला पाठविण्यात येतो.थेट शेतकºयांच्या शेतातून ट्रकने मुंबई येथील न्हावाशिवा बंदरापर्यंत व पुढे बोटीच्या साह्याने समुद्रातून दुबई येथील व्यापारी आयूब खान यांच्याकडे रवाना केला जातो. हा ऊस पुढे रसवंतिगृहासाठी पाठविण्यात येतो, असे संपत गवारी यांनी सांगितले. सध्या मंदीचे वातावरण व पाऊस आणि थंडी यांमुळेही उसाला मागणी कमी आहे.आजपर्यंत मुंबई, दिल्ली, हरियाणा, ग्वाल्हेर, हैदराबाद, जम्मू आदी भागांमध्ये या परिसरातील शेतकºयांच्या शेतातील ऊस हा उसाच्या गुणवत्तेनुसार पाठविला गेलेला आहे. परंतु, आता शिरूर तालुक्यातील दर्जेदार ऊस प्रथमच दुबई येथे रवाना होत आहे. -संपत गवारी, ऊस व्यापारी- विठ्ठलवाडीसाधारण २५ हजार रुपये एवढ्या कमीत कमी खर्चामध्ये अवघ्या दहा महिन्यांत बारा फुटी लांब कांड्यांचे उसाचे उत्पादन एकरी ६० टन घेऊन दुबईला पाठविल्याने मंदीच्या काळातही १ लाख ५३ हजार रुपये मिळाले आहेत. -जालिंदर भाऊसाहेब ढमढेरे,प्रगतिशील शेतकरी, तळेगाव ढमढेरे

टॅग्स :DubaiदुबईPuneपुणेFarmerशेतकरी