शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

न्यायालयाच्या नियमांचे पालन करूनच बैलगाडा शर्यत घ्या; प्रकाश जावडेकर यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 19:52 IST

बैलगाडा संघटनांच्या माध्यमातून न्यायालयीन लढा आपण जिंकला

पिंपरी : आपल्याकडे बैलांना मारत नाहीत, इंजेक्शन देत नाहीत, मुलांप्रमाणे प्रेम करतात. मात्र, काही आक्षेपांमुळे महाराष्ट्राचे आणि भारताचे सांस्कृतिक वैभव अशाणारी बैलगाडा शर्यत बंद झाली होती. आहे. न्यायालययीन लढ्याला यश मिळाले. शर्यंत सुरू झाली आहे. बैलगाडा संस्कृती टिकली पाहिजे, जोपासली पाहिजे. त्यासाठी न्यायालयाच्या नियमांचेही पालन करूनच स्पर्धांचे आयोजन करावे, असे मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चिखलीत व्यक्त केले.

चिखली जाधववाडी येथील जय हनुमान बैलगाडा मंडळाच्या वतीने रामायण मैदानवर बैलगाडा शर्यत सुरू आहे. शर्यतीच्या तिसऱ्या दिवशी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट दिली. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे उपस्थित होते.

प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘‘मी खेड्यातून आलोय, बैलाची निगा किती शेतकरी राखतात. त्याचे औषधपाणी खाणे, पिणे, सगळ्या गोष्टी करतात. मुलाप्रमाणे सांभाळतात. शेतकरी जो प्रेम करतो, त्याला प्रासंगिक महोत्सव साजरे करता आले पाहिजेत. बंद असता कामा नये, त्यासाठी काही पथ्ये असली पाहिजेत.  मी केंद्रीय पर्यावरण मंत्री असताना देशातील बैलगाडा शर्यत सुरू करण्याबाबत अध्यादेश काढला. मात्र, काही प्राणीमित्र संघटना न्यायालयात गेल्या. पण,  बैलगाडा संघटनांच्या माध्यमातून न्यायालयीन लढा आपण जिंकला. शेतकरी बैल पळवतो, जोपासतो तसे त्याचे आजारपणही पाहतो. वटपूजा जशी होते तशी आम्ही बैलाचीही पुजा आम्ही करतो. तमिळनाडूत जलीकट्टू आणि कर्नाटकात बैलगाडा शर्यतीला कंबाला म्हणतात. तसे महाराष्ट्रातील छकडा हे देशातील ग्रामीण संस्कृतीचे वैभव आहे.’’

राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, ‘‘बैलगाडा ही शेतकऱ्यांची संस्कृती आहे. गावगाड्यात राबणारा शेतकरी बैलांना जीव लावतो. देशी गायीच्या पोटाला जे खोंड येते. त्याला बैलागाडा घाटात पळवले जाते. त्यातून मिळणारे उत्पन्न हे त्या शेतकºयाला जणू पाच एकर शेती एकाच वर्षी पिकावी, असे असते. त्यासाठी देशी गाय, गोवंश वाचला पाहिजे म्हणून प्रयत्न केले. आणि बैलगाडा शर्यत सुरू झाली.’’

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरBull Cart Raceबैलगाडी शर्यतCentral Governmentकेंद्र सरकारCourtन्यायालय