शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात स्वाइन फ्लूचा पुन्हा उद्रेक, आठ दिवसांत २६ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 04:14 IST

राज्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे.

पुणे : राज्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. शनिवारपर्यंत राज्यात ८२ जणांचा बळी गेला आहे. त्यामध्ये पुणे व नाशिक जिल्ह्यातील रुग्ण अधिक आहेत. रविवारी गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे गर्दी होईल, त्यामुळे स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.जुलैपासून बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. १४ सप्टेंबरपर्यंत राज्यात ५६ जणांचा मृत्यू झाला होता. मागील आठ दिवसांतच आणखी २६ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ८२ वर पोहोचला आहे. राज्यातील विविध रुग्णालयांमधील उपचार घेत असलेल्या तसेच व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या जास्त आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये २६ तर पुणे जिल्ह्यात २८ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. निम्म्यापेक्षा जास्त मृत्यू या दोन जिल्ह्यांतच झाले आहे. नाशकात तर १ हजार ९४९ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. ३३५ अतिगंभीर रुग्णांपैकी २६ जणांना प्राण गमवावे लागले. जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत स्वाइन फ्लूच्या दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नगर जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात प्रत्येकी ९ तर सातारा जिल्ह्यात ७ जणांचा बळी गेला आहे.विसर्जन मिरवणुकीत काळजी घ्यागणेश विसर्जनामुळे रविवारी सर्वत्र मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे सर्दी, ताप अशी स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहन डॉ. प्रदीप आवटे यांनी केले.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूMaharashtraमहाराष्ट्र