शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

राज्यात स्वाइन फ्लूचा पुन्हा उद्रेक, आठ दिवसांत २६ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 04:14 IST

राज्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे.

पुणे : राज्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. शनिवारपर्यंत राज्यात ८२ जणांचा बळी गेला आहे. त्यामध्ये पुणे व नाशिक जिल्ह्यातील रुग्ण अधिक आहेत. रविवारी गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे गर्दी होईल, त्यामुळे स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.जुलैपासून बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. १४ सप्टेंबरपर्यंत राज्यात ५६ जणांचा मृत्यू झाला होता. मागील आठ दिवसांतच आणखी २६ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ८२ वर पोहोचला आहे. राज्यातील विविध रुग्णालयांमधील उपचार घेत असलेल्या तसेच व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या जास्त आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये २६ तर पुणे जिल्ह्यात २८ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. निम्म्यापेक्षा जास्त मृत्यू या दोन जिल्ह्यांतच झाले आहे. नाशकात तर १ हजार ९४९ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. ३३५ अतिगंभीर रुग्णांपैकी २६ जणांना प्राण गमवावे लागले. जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत स्वाइन फ्लूच्या दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नगर जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात प्रत्येकी ९ तर सातारा जिल्ह्यात ७ जणांचा बळी गेला आहे.विसर्जन मिरवणुकीत काळजी घ्यागणेश विसर्जनामुळे रविवारी सर्वत्र मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे सर्दी, ताप अशी स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहन डॉ. प्रदीप आवटे यांनी केले.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूMaharashtraमहाराष्ट्र