शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यात स्वाइन फ्लूचा पुन्हा उद्रेक, आठ दिवसांत २६ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 04:14 IST

राज्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे.

पुणे : राज्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. शनिवारपर्यंत राज्यात ८२ जणांचा बळी गेला आहे. त्यामध्ये पुणे व नाशिक जिल्ह्यातील रुग्ण अधिक आहेत. रविवारी गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे गर्दी होईल, त्यामुळे स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.जुलैपासून बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. १४ सप्टेंबरपर्यंत राज्यात ५६ जणांचा मृत्यू झाला होता. मागील आठ दिवसांतच आणखी २६ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ८२ वर पोहोचला आहे. राज्यातील विविध रुग्णालयांमधील उपचार घेत असलेल्या तसेच व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या जास्त आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये २६ तर पुणे जिल्ह्यात २८ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. निम्म्यापेक्षा जास्त मृत्यू या दोन जिल्ह्यांतच झाले आहे. नाशकात तर १ हजार ९४९ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. ३३५ अतिगंभीर रुग्णांपैकी २६ जणांना प्राण गमवावे लागले. जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत स्वाइन फ्लूच्या दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नगर जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात प्रत्येकी ९ तर सातारा जिल्ह्यात ७ जणांचा बळी गेला आहे.विसर्जन मिरवणुकीत काळजी घ्यागणेश विसर्जनामुळे रविवारी सर्वत्र मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे सर्दी, ताप अशी स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहन डॉ. प्रदीप आवटे यांनी केले.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूMaharashtraमहाराष्ट्र