शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

स्वामी आनंद यशवंत... ओशोंचे निस्सिम अनुयायी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 02:21 IST

मराठी भावसंगीत क्षेत्रात अवीट गोडीच्या गीतांची श्रृंखला सादर करणारे प्रतिभावंत संगीतकार आणि गीतकार अशी यशवंत देव यांची ओळख. पण ओशोंचे निस्सिम भक्त म्हणून त्यांचा एक वेगळा पैलू आहे, ज्याबददल फारसे कुणीच परिचित नाही....

पुणे : मराठी भावसंगीत क्षेत्रात अवीट गोडीच्या गीतांची श्रृंखला सादर करणारे प्रतिभावंत संगीतकार आणि गीतकार अशी यशवंत देव यांची ओळख. पण ओशोंचे निस्सिम भक्त म्हणून त्यांचा एक वेगळा पैलू आहे, ज्याबददल फारसे कुणीच परिचित नाही....ओशो आश्रमामध्ये ‘स्वामी आनंद यशवंत’ या नावाने ते ओळखले जायचे. त्यांचे हदय हे एका भक्ताचे होते. ज्या काळात ओशो यांचे नाव घ्यायलाही लोक घाबरायचे. मनात भाव असूनही सार्वजनिक ठिकाणी अनेकांना ओशोंबददल बोलण्यास धजावायचे नाही मात्र यशवंत देव हे जाहीर कार्यक्रमात ओशो यांचे नाव घेऊन त्यांचे भक्त असल्याचे सांगायचे....ओशो आश्रमाच्या प्रमुख मॉं अमृत साधना यशवंत देव नामक एका भक्ताचे ओशोंप्रती असलेले सात्विक प्रेम उलगडत होत्या.पुण्यातील ओशो आश्रमात यशवंत देव हे एखाद्या संन्यासारखे राहायचे. भगवे कपडे घालून, त्यांनी आश्रमात कार्यक्रमही केले आहेत. आमच्या उत्सवातही ते गायला यायचे. त्यांनी ओशो यांच्यावर ‘ओशो गये कहा है, ओशो अभी यहा है’, ’युग युग मैं तुमको फिर आना पडेगा’ अशा स्वरूपाच्या कविता त्यांनी रचल्या आहेत. ज्यावेळी ओशो अमेरिकेतून यायचे तेव्हा मुंबईमध्ये उतरून देव यांना प्रवचनातून गात जा, असे सांगायचे. ओशो यांच्यासमोर बसून त्यांचे भाव गाण्यापेक्षा ते स्वत:च ओशोंवर रचना लिहायचे. त्यांना ध्यानाची प्रचंड ओढ होती. ध्यानात भाव असेल तर बैठक पक्की होते. यासाट् तासनतास ते ध्यानाला बसायचे. हा प्रांजळपणा त्यांच्यात पाहायला मिळायचा. यश मिळालेल्या व्यक्तीमध्ये अनेकदा अहंकार पाहायला मिळतो पण त्यांच्या वागण्यामध्ये तो कधीच जाणवला नाही. ओशोंचे नाव घेताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे. देव यांच्या व्यक्तिमत्वाचे अजून एक वैशिष्ट म्हणजे त्यांची विनोदबुद्धधी. एका श्वासात गाणं तर दुस-या बाजूला प्रत्येक गोष्टीमध्ये कोटी करण्याची त्यांची मिस्किल शैली दिसायची. आम्ही त्यांना गुरूबंधू मानत होतो. अध्यात्म ही त्यांच्या जीवनाची मोठी ताकद होती. ध्यानामुळे आत्मबळ येते. यशवंत देव हे अत्यंत दुर्मिळ व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने एक भाग गळून पडल्यासारखा झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.फार कमी कलाकार असे असतात जे कविता, गाण आणि शब्द सुरांच्या स्वभावाविषयी अचूक बोलू शकतात आणि सहजपणे लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. त्यातील देवसाहेब एक होते. ख-या अर्थाने शब्दसुरांना आनंद देणे त्यांच्यामध्ये होते. त्या त्या वयात जाणे हे नैसर्गिक असले तरी त्या व्यक्तीच्या निधनाने अनेक माणस जाणे हे जास्त त्रासदायक आहे. उत्तम रसिक, शिक्षक आस्वादक निघून जाणे ही सांस्कृतिक समृद्धता कमी करणारे आहे. यशवंत देव यांच्या निधनाने भावगीत विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. - सलील कुलकर्णी, संगीतकारयशवंत देव हे स्वरानंद प्रतिष्ठानचे मानद अध्यक्ष होते. संस्थेवर त्यांचे निस्सीम प्रेम होते. त्यांचा अमृतमहोत्सवी आणि ऐंशीवा वाढदिवस आम्ही साजरा केल्याने त्यांचं पुण्याशी नात जोडले गेले. अनेक कलाकारांना त्यांनी मार्गदर्शन केले. देव यांच्या अनेक कार्यशाळा स्वरानंद ने आयोजित केल्या होत्या. त्यांच्या निधनाने स्वरानंदचा आधारवडच कोसळला.- प्रकाश भोंडे, स्वरानंद प्रतिष्ठान

टॅग्स :Puneपुणे