शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जिरेगावात महिला संशयास्पद बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:03 IST

खुनाची चर्चा : बनाव असल्याचा पोलिसांचा अंदाज

कुरकुंभ : जिरेगाव (ता.दौंड) येथील कौठडी रस्त्यावर गायींच्या गोठ्यात मजूर म्हणून काम करीत असलेल्या निरंजन यादव याची पत्नी हिना निरंजन यादव (वय अंदाजे २८, दोघेही मूळ राहणार देवचंद, ता.राघोपूर, जिल्हा बैशाली,बिहार) ही बुधवारी पहाट बेपत्ता झाली. तिचा कोणताच ठावठिकाणा नसल्याने तिचा घातपात झाल्याची चर्चा परिसरात होत असून पोलिसांनी मात्र हा प्रकार म्हणजे बनाव असल्याचे सांगितले.

दरम्यान घटनेच्या ठिकाणी सापडलेल्या रक्ताचे नमुने तपासासाठी पाठवले असून याबाबत लवकरच सत्यता समोर येईल अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली आहे. याबाबत पोलिसांनी सागंतिलेली माहिती अशी की, जिरेगाव परिसरात नंदकुमार जाधव (रा. कोथरूड, पुणे) यांच्या मालकीचे शेत असून यामध्ये गिर गायींचा गोठा आहे. यामध्ये निरंजन यादव त्याची पत्नी हीना व वडील शंकर राय व दोन छोटी मुले राहत आहेत. बुधवारी पहाटेपासून हीना बेपत्ता झाल्यावर परिसरात तिचा शोध करण्यात आला. त्यावेळी या परिसरात असणाऱ्या गोठ्याच्या बाजूला रक्ताने माखलेली साडी आढळली तर बाजूलाच असणाºया विहिरीच्या आत एका साडीला दगड बांधून आत टाकलेले आढलले. त्यामुळे हिनाचा घातपात झाल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक,पोलीस जमादार के. बी. शिंदे यांनी घटनेच्या ठिकाणी तात्काळ भेट दिली. त्यांनी केलेल्या प्राथमिक तपासात हीना पळून गेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला तर रक्त आणि विहिरीतीलसाडी वगैरे हा बनाव असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. मात्र तपासासाठी रक्ताचे नमूने त्यांनी तपासणीसाठी पाठविले आहेत.कुरकुंभ येथे आज हीना बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे. यासाठी सर्व बाबी विचारात घेवून तपास दूरू आहे. यादव कुटुंबाची कसून चौकशी करण्यात आली असून बारामती परिसरातील त्यांच्या ओळखीचे अन्य काही जणांना देखील तपासासाठी पोलिसांनी बोलावले आहे. जिरेगाव येथील जंगल परिसरात यापूर्वी देखील दोन वेळेस मृतदेह आढळून आले होते. मात्र पोलीसांनी अगदी नाममात्र पुराव्यावरून दोन्ही गुन्ह्याची उकल केली आहे. त्यामुळे या गुन्ह्याबाबत पोलिसांनाही खोलवर तपास करावा लागणार आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी