शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ससूनमध्ये विजांच्या प्रकाशात गांधीजींवर झाली होती ‘शस्त्रक्रिया’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 11:37 IST

बावीस महिन्यांच्या तुरुंगातील जीवनाचा गांधीजींच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम झाला.

ठळक मुद्देससूनच्या इमारतीवर ‘महात्मा गांधी स्मारक’ अशी आठवण कोरून ठेवली

पुणे आणि महात्मा गांधी यांचे एक अद्वितीय असं नातं होतं. १८ मार्च १९२२ रोजी महात्मा गांधी यांना अहमदाबादच्या सत्र न्यायाधीशांनी देशद्रोहासाठी सहा वर्षांची साधी कारावासाची शिक्षा ठोठावली होती. पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतीमागे भारतीय राष्ट्राच्या मूर्त प्रतीकाला बंदिस्त करण्यात आले होते. त्यांच्यावर तुरुंगाचे मॅन्युअल कठोरपणे लागू करण्यात आले होते आणि तरीही गांधीजी तुरुंगात ‘मुक्त पक्ष्या’सारखे आनंदात वावरत होते. बावीस महिन्यांच्या तुरुंगातील जीवनाचा गांधीजींच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम झाला. १२ जानेवारी १९२४ च्या  रात्री  चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, राज्यकैदी गांधीजींवर  कर्नल मॅडॉक यांनी पुण्याच्या ससून रुग्णालयात शस्त्रक्रिया केली होती. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान विद्युतप्रवाह खंडित झाला. चक्रीवादळातील विजांच्या प्रकाशात गांधी यांची ‘अपँडेटॉमी’ची शस्त्रक्रिया पूर्ण करावी लागली. गांधीजींनी शल्यविशारदांचे आभार मानले आणि त्यांच्यात मैत्रीचे बंध जुळले.  ४ फेब्रुवारी रोजी शासनाने अनपेक्षितपणे गांधीजींच्या शिक्षेतील काही भाग कमी केला आणि गांधीजींची विनाअट मुक्तता केली. तेव्हा ‘माझ्या सुटकेमुळे मला काहीच दिलासा मिळालेला नाही,’ अशी गांधीजींची प्रतिक्रिया होती. ४ ऑगस्ट १९३३ रोजी  गांधीजींना पुणे शहराच्या हद्दीत राहण्यासाठी संयमीपणा दाखविण्यास सांगण्यात आले होते. मात्र या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना एक वर्ष कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. येरवडा कारागृहात हरिजनचे काम करण्यास नकार दिल्याने त्यांनी १८ ऑगस्ट रोजी ‘आमरण’ उपोषण सुरू केले. दि. २१ ऑगस्ट रोजी गांधीजींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले. गांधीजींनी प्रार्थना केली आणि संत्राचा ज्यूस पिऊन  उपवास तोडला. ससूनच्या इमारतीवर ‘महात्मा गांधी स्मारक’ अशी आठवण कोरून ठेवली असल्याची माहिती ससून प्रशासनाने दिली.

टॅग्स :PuneपुणेMahatma Gandhiमहात्मा गांधीsasoon hospitalससून हॉस्पिटल