शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वेताळ टेकडीवरील एकही झाड न कापता इतर पर्याय शोधावेत- सुप्रिया सुळे

By श्रीकिशन काळे | Updated: April 18, 2023 15:39 IST

लोकांच्या भावना प्रशासनाने लक्षात घ्याव्यात...

पुणे‘‘जनतेचा विरोध होत असेल, तर प्रशासनाने त्याचा विचार करायला हवा. पुण्याचे पर्यावरण वाचविणे आवश्यकच आहे. टेकडीवरील पर्यावरण कमी न करता, एकही झाड न कापता त्या रस्त्यासाठी इतर पर्याय पहायला हवेत,’’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

सध्या वेताळ टेकडीवरील प्रस्तावित बालभारती रस्त्याला प्रचंड विरोध होत आहे. त्याविषयी जाणून घेण्यासाठी सुळे यांनी मंगळवारी वेताळ टेकडीची पाहणी केली. त्या लॉ कॉलेज रोडवरील कांचनगल्लीमध्ये दुपारी १ वाजता आल्या. त्यांनी कृती समितीच्या सदस्यांसमवेत रस्ता कुठून जाणार आहे ? किती आणि कोणती झाडं तोडणार आहेत, त्याविषयी माहिती घेतली. त्यानंतर वन विभागाच्या कार्यालयात बसून कृती समितीने तयार केलेले टेकडीबाबतचे सादरीकरणही जाणून घेतले. या वेळी समितीचे प्रदीप घुमरे, सुमिता काळे, डॉ. सुषमा दाते, पृथ्वीराज, शाल्मली पवार, समीर शिंदी आदी उपस्थित होते. उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहाय्यक उपवनसंरक्षक दीपक पवार हे देखील सादरीकरणावेळी उपस्थित होते.

सुळे म्हणाल्या,‘‘विकास करणे आवश्यक असले तरी पर्यावरण संवर्धनही केले पाहिजे. वेताळ टेकडीवरून रस्ता काढायचा असेल तर इतर पर्याय पहावेत. एकही झाड कापू नये. लोकांच्या भावना प्रशासनाने लक्षात घ्यायला हवे. आम्ही तज्ज्ञ लोकांशी बोलू. तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून टेकडीवरील झाडे कापली जाणार नाहीत, हे पाहून वाहतुकीला इतर पर्याय शोधावेत.’’

ही टेकडी नाही तर काय आहे मग ?महापालिका आयुक्त विक्रम कुमार यापूर्वी म्हणाले होते की, रस्ता होतोय, ती टेकडीच नाही.’’ त्यावर सुळे म्हणाल्या,‘‘ ‘‘काही लोकं म्हणतात, टेकडीवर रस्ता आहे, तर काही लोकं म्हणतात टेकडवर रस्ता नाही. यामध्ये वस्तूस्थिती काय आहे ? ते पाहण्यासाठी मी टेकडी पहायला आले. प्रशासनाला वाटत असेल की, ही टेकडी नाही, तर मी पाहिली ना ही टेकडीच आहे. त्यांना जर वाटत नसेल की ही टेकडी नाही, तर मग टेकडी कशी असते ?’’ असा अप्रत्यक्ष सवाल त्यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना विचारला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSupriya Suleसुप्रिया सुळेMaharashtraमहाराष्ट्र