शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

Supriya Sule: मी ते पुस्तक वाचलंय, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर सुप्रिया सुळेंचा सर्वांनाच सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 15:27 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत मनसेचे प्रमुख नेते आणि प्रवक्त्यांची महत्वाची बैठक झाली

मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन राजकारण तापलं आहे. राज ठाकरेंच्या विरोधात उत्तर भारतीय खासदारांसह अनेकजण एकत्र येऊन त्यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करत आहेत. तर, काहीजण समर्थनार्थही भूमिका मांडत आहेत. त्यामुळे, राज ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. ते 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. त्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला असता त्यांनी सर्वांनीच भारत देश फिरला पाहिजे, असे उत्तर दिलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत मनसेचे प्रमुख नेते आणि प्रवक्त्यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत अयोध्या दौऱ्याबाबत माध्यमांशी बोलताना संयम बाळगण्याबाबत मनसे अध्यक्षांनी नेत्यांना मार्गदर्शन केलं. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या बैठकीनंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना खासदार बृजभूषण सिंह यांनी दिलेल्या धमकी आणि केलेल्या विधानालाही संयमी उत्तर दिलं. बृजभूषण शरण सिंह आपली भावना व्यक्त करत आहेत. त्यावर पक्षप्रमुख बोलतील. एका खासदाराने मांडलेलं मत हे संपूर्ण उत्तर प्रदेशचं असू शकत नाही, असे नांदगावकर यांनी म्हटलं. यासंदर्भात सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी भारत दर्शन सर्वांनीच करायला हवं, असे उत्तर दिलं. ''भारत हा सुंदर देश आहे. माझी सर्वच भारतीयांना विनंती आहे, कश्मीर ते कन्याकुमारी सगळ्यांनीच भारत दर्शन करावे. पंडित जवाहरलाल नेहरुंनी भारत एक खोज हे अप्रतिम पुस्तक लिहलं आहे, मी ते पुस्तक वाचलंय आणि देशही फिरले आहे. तसंच, सगळे करत असतील तर ते देशासाठी चांगलंच आहे,'' असे उत्तर सुप्रिया सुळेंनी दिले.

राज ठाकरेंना धमकीचं पत्र - नांदगांवकर

"माझ्या लालबागच्या कार्यालयात काल एक धमकीचं पत्र प्राप्त झालं आहे. त्यात मला आणि राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत मी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मी राज ठाकरेंना ते पत्र दाखवलं व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून संबंधित पत्र त्यांच्याकडे दिलं आहे. आता ते याबाबत चौकशी करतील. गृहमंत्र्यांनी तातडीनं पोलीस आयुक्तांशी बोलून याचा तपास करण्याचं आश्वासन मला दिलं आहे. पण एक सांगतो. मला दिलेली धमकी एक वेळ ठीक. पण राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटून उठेल हे राज्य सरकारनं लक्षात ठेवावं", असं बाळा नांदगावकर म्हणाले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSupriya Suleसुप्रिया सुळेJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूAyodhyaअयोध्या