शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

भोर तालुक्यातून कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग सुरू करा- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 19:27 IST

सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत ही मागणी केली आहे...

बारामती (पुणे) : सध्या महाराष्ट्रात कोकण रेल्वे व पश्चिम रेल्वेलाइनला जोडणारा कोणताही रेल्वेमार्ग अस्तित्वात नाही, तसेच पूर्व भागाला जोडणारा व कोकणात विविध बंदरे, सागरी मार्गांवरील माल वाहतूक करण्यासाठीही समर्पित रेल्वेमार्ग नाही. हे लक्षात घेता बेलसर-वाल्हा-लोणंदपासून भोर तालुक्यातून कोकण रेल्वेला महाडजवळ जोडणारा लोहमार्ग सुरू करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत ही मागणी केली आहे. हा रेल्वेमार्ग सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात माल आणि प्रवासी वाहतूक स्वस्त व कमी वेळेस होण्यास मदत होईल. बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. याचा परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी मोठा फायदा होईल. यासाठी येथील दळणवळण व्यवस्था मजबूत आणि लोकांच्या सोयीची असणे आवश्यक आहे.

बेलसर-वाल्हा-लोणंदपासून भोर तालुक्यातून कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग सुरू होणे फायदेशीर होईल. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, बारामती, इंदापूर, दौंड, खडकवासला, तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, वाई, माण आदी भागांतील, तसेच पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागाच्या औद्योगिक व इतर विकासाला चालना मिळू शकेल.

हा मार्ग पुणे-मिरज-बेंगलोर या मार्गालादेखील जोडता येईल. हा मार्ग अतिशय कमी अंतराचा आहे, तो जनतेच्या सोयीचा आहे. त्यामुळे कृपया या मार्गाचे सर्वेक्षण करून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी सुळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रbhor-acभोर