शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

कुटुंबातील निष्पाप व्यक्तींना मिळणार दिलासा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 02:56 IST

हुंडाबळीचा गुन्हा : शहानिशा होऊनच सासरच्या व्यक्तींची नावे प्रकरणात येणार

पुणे : कुटुंबीयांचा सहभाग असल्याची शहानिशा होत नाही, तोपर्यंत त्यांची नावे हुंडाबळीसारख्या प्रकरणात घेण्यात येऊ नयेत, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे कौटुंबिक वाद आणि हुंडाबळी सारख्याप्रकरणात नाहक अडकवल्या जाणाऱ्या सासरच्या मंडळींना दिलासा मिळाला आहे.

न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. जोपर्यंत संबंधित नातेवाइकाचा त्या प्रकरणात सहभाग स्पष्ट होत नाही, तोपर्यंत त्याला आरोपीच्या पिंजºयात उभे करण्यात येऊ नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. तक्रारीच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार थांबतील, असा विश्वास प्रक्टिस करणा-या वकिलांनी व्यक्त केला आहे.

जोपर्यंत गुन्हा शाबीत होत नाही तोपर्यंत आरोपी हा गुन्हेगार नसतो. या कायद्यांर्तगत तक्रार झाल्यानंतर समुपदेशन करावे आणि त्यानंतर एफआयआर दाखल करायची, अशी प्रक्रिया आहे. पूर्वी एफआयआर नोंदवून मग चौकशी व्हायची. त्यामुळे दोषी नसलेल्या व्यक्तींची नाहक बदनामी होता. या निर्णयमुळे कुटुंबातील इतर व्यक्तींना खोट्या आरोपामुळे त्रास होणार नाही.- अ‍ॅड. आम्रपाली कांबळे-कसबे

उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करते. सासरच्या व्यक्तींना त्रास देण्यासाठी किंवा त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी दोषी नसतानाही त्यांची नावे घेतली होत आहेत, असे काही प्रकरणांमध्ये दिसून आले. या निर्णयामुळे गुन्ह्यातील सत्यता तपासल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. पक्षकारांचा खरेपणा सिद्ध होत नाही तोपर्यंत याप्रकरणात नातेवाईकांचा सहभाग करणे चुकीचे होते.- अ‍ॅड. सुप्रिया डोंगरे

सूडाची भावना म्हणून कुटुंबातील व्यक्तींची नावे घेऊन त्यांना या प्रकरणात गोवण्यात येते. कुटुंबीयांना नाहक त्रास होत असल्याने पती अशावेळी पत्नीचे म्हणने मान्य करतो. त्यामुळे दबावतंत्र म्हणूनदेखील याचा वापर होत. त्या प्रकारांना या निकालामुळे लगाम बसेल.- अ‍ॅड. अभय शिरसट

या प्रकरणांमध्ये नणंद अनेकदा टार्गेट केली जाते. सासू-सासरे देखील लिस्टवर असतात. नणंद परदेशात राहायला असली, तरी तिचे नाव तक्रारीमध्ये देण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. नणंदेने फोनवरून किंवा घरी आल्यानंतर भावाच्या संसारात लक्ष घातले असेल तर तिच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र यासर्वांची सत्यता तपासणे गरजेचे आहे.- अ‍ॅड. सुनीता जंगम

गुन्हा दाखल झाल्यानंतर, अटक होऊ नये किंवा खोट्या गुन्ह्यात अडकले जाऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे घटना नेमकी काय आहे, त्यात दोष कोणाचा आहे, यानुसार संबंधितांना अटक होणे गरजेचे आहे. या निकालातून ते साध्य होईल.- अ‍ॅड. अभिजित निंबकर

टॅग्स :Courtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयPuneपुणे