शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कुटुंबातील निष्पाप व्यक्तींना मिळणार दिलासा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 02:56 IST

हुंडाबळीचा गुन्हा : शहानिशा होऊनच सासरच्या व्यक्तींची नावे प्रकरणात येणार

पुणे : कुटुंबीयांचा सहभाग असल्याची शहानिशा होत नाही, तोपर्यंत त्यांची नावे हुंडाबळीसारख्या प्रकरणात घेण्यात येऊ नयेत, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे कौटुंबिक वाद आणि हुंडाबळी सारख्याप्रकरणात नाहक अडकवल्या जाणाऱ्या सासरच्या मंडळींना दिलासा मिळाला आहे.

न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. जोपर्यंत संबंधित नातेवाइकाचा त्या प्रकरणात सहभाग स्पष्ट होत नाही, तोपर्यंत त्याला आरोपीच्या पिंजºयात उभे करण्यात येऊ नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. तक्रारीच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार थांबतील, असा विश्वास प्रक्टिस करणा-या वकिलांनी व्यक्त केला आहे.

जोपर्यंत गुन्हा शाबीत होत नाही तोपर्यंत आरोपी हा गुन्हेगार नसतो. या कायद्यांर्तगत तक्रार झाल्यानंतर समुपदेशन करावे आणि त्यानंतर एफआयआर दाखल करायची, अशी प्रक्रिया आहे. पूर्वी एफआयआर नोंदवून मग चौकशी व्हायची. त्यामुळे दोषी नसलेल्या व्यक्तींची नाहक बदनामी होता. या निर्णयमुळे कुटुंबातील इतर व्यक्तींना खोट्या आरोपामुळे त्रास होणार नाही.- अ‍ॅड. आम्रपाली कांबळे-कसबे

उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करते. सासरच्या व्यक्तींना त्रास देण्यासाठी किंवा त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी दोषी नसतानाही त्यांची नावे घेतली होत आहेत, असे काही प्रकरणांमध्ये दिसून आले. या निर्णयामुळे गुन्ह्यातील सत्यता तपासल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. पक्षकारांचा खरेपणा सिद्ध होत नाही तोपर्यंत याप्रकरणात नातेवाईकांचा सहभाग करणे चुकीचे होते.- अ‍ॅड. सुप्रिया डोंगरे

सूडाची भावना म्हणून कुटुंबातील व्यक्तींची नावे घेऊन त्यांना या प्रकरणात गोवण्यात येते. कुटुंबीयांना नाहक त्रास होत असल्याने पती अशावेळी पत्नीचे म्हणने मान्य करतो. त्यामुळे दबावतंत्र म्हणूनदेखील याचा वापर होत. त्या प्रकारांना या निकालामुळे लगाम बसेल.- अ‍ॅड. अभय शिरसट

या प्रकरणांमध्ये नणंद अनेकदा टार्गेट केली जाते. सासू-सासरे देखील लिस्टवर असतात. नणंद परदेशात राहायला असली, तरी तिचे नाव तक्रारीमध्ये देण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. नणंदेने फोनवरून किंवा घरी आल्यानंतर भावाच्या संसारात लक्ष घातले असेल तर तिच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र यासर्वांची सत्यता तपासणे गरजेचे आहे.- अ‍ॅड. सुनीता जंगम

गुन्हा दाखल झाल्यानंतर, अटक होऊ नये किंवा खोट्या गुन्ह्यात अडकले जाऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे घटना नेमकी काय आहे, त्यात दोष कोणाचा आहे, यानुसार संबंधितांना अटक होणे गरजेचे आहे. या निकालातून ते साध्य होईल.- अ‍ॅड. अभिजित निंबकर

टॅग्स :Courtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयPuneपुणे