शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

वालचंदनगर परिसरात सूर्यफुल शेती बहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 2:23 AM

खाण्याच्या तेलाचे भाव गगनाला भिडलेले असल्याने वालचंदनगर परिसरातील शेतकरी सूर्यफुल भुईमूग अशा तेलयुक्त पिकांचे उत्पादन घेण्यासाठी सरसावला आहे. शेतक-याने धाडस करून सूर्यफुलाचे उत्पादन घेण्यास यावर्षी सुरूवात केलेले आहेत. सूर्यफुल बहरात आल्याने शेती लक्ष वेधून घेत आहे.

 वालचंदनगर : खाण्याच्या तेलाचे भाव गगनाला भिडलेले असल्याने वालचंदनगर परिसरातील शेतकरी सूर्यफुल भुईमूग अशा तेलयुक्तपिकांचे उत्पादन घेण्यासाठी सरसावला आहे. शेतकºयाने धाडस करून सूर्यफुलाचे उत्पादन घेण्यास यावर्षी सुरूवात केलेले आहेत. सूर्यफुल बहरात आल्याने शेती लक्ष वेधून घेत आहे.वालचंदनगर, रणगांव, शिरसटवाडी या परिसरातील अनेक शेतकरी अनेक वर्षानंतर सूर्यफुल या नगदी पिके घेण्याकडे वळलाआहे. तब्बल ३० वर्षांनंतर सूर्यफुल मोठ्या डौलदारपणे डवलत असल्याने अनेकांची मने जिंकून घेतले जात आहे. सर्वत्र पिवळेधमक रान दिसत असल्याने अनेक तरूण आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी काढण्यासाठी सरसावलेले दिसत आहेत. खरिपाच्या पेरणीत पहिल्यांदाच सूर्यफुलाची पेरणी करण्यात आलेली आहे. बाजारातील खाण्याच्या तेलाचे वरचेवर वाढत चाललेले भाव परवडत नसल्यामुळे शेतकरी घरच्या घरीच तेलाचे उपाय शोधून काढत आहेत. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत असून तालुक्यातून हद्दपार झालेल्या तूर उत्पादनाच्या क्षेत्रात कमालीची वाढ होताना दिसत आहे. शेकडो एकरात तुरीची पेरणी करून हजारो टन तुरीचे उत्पादन इंदापूर तालुक्यात घेण्यातआलेले आहे. खरीपाच्या हंगामात पेरण्यात येणारे तुर, बाजरी, मुग, उडीद, सोयाबीन, सूर्यफुल या पिकाचे उत्पादनाच्या क्षेत्रात वाढ होत आहे.गेल्यावर्षी या भागातील शेतकºयाने तुरीचे भरमसाठ उत्पादन घेतले परंतु योग्य बाजारभाव मिळाले नसल्याने शेतकºयांत नाराजी पसरलेले होते. परंतु, ५ हजार भाव पहिल्यांदाच मिळाल्याने व डाळीचे कायमचे प्रश्न मार्गी लागल्यामुळे शेतकरी समाधानी होते.याही वर्षी तूर, उडीद, मूग, सोयाबीन त्यात भर म्हणून सूर्यफुलाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे