शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

रविवार मुलाखत- माणूस जगला तरच धर्म वाचेल.. : सय्यदभाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 07:00 IST

तरुणांनी मातृभूमीच्या आणि महिलांच्या न्यायासाठी लढले पाहिजे..

ठळक मुद्दे चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौैरव पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त संवाद

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : धर्मगुरुंचे महत्व धर्मस्थळांपुरतेच मर्यादित असले पाहिजे. धर्मगुरुंपेक्षाही कायदे महत्वाचे आहेत. सामान्यांनी आपले जाती-धर्म घरात खुंटीला टांगून माणूस म्हणून घराबाहेर पडावे. कारण, कोणत्याही धर्मापेक्षा राष्ट्रधर्म सर्वश्रेष्ठ आहे. समता आणि बुध्दिप्रामाण्यवाद कायमच महत्वाचा आहे. धर्म ही संकल्पनाच कालबाह्य झाली आहे. माणूस जगला तरच धर्म वाचेल. तरुणांनी मातृभूमीच्या आणि महिलांच्या न्यायासाठी लढले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका मुस्लिम सत्यशोधक समाजाचे सय्यदभाई यांनी व्यक्त केली. ‘दगडावरची पेरणी’ या आत्मचरित्राचा आसामी भाषेत अनुवाद झाला असून, आता बंगाली अनुवादाचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. चतुरंग प्रतिष्ठानतर्फे यंदाचा जीवनगौैरव पुरस्कार सय्यदभाई यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्त ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी साधलेला संवाद.--------------* लहानपणीचे दिवस कसे होते?- मी कुटुंबासह रेंज हिल्स परिसरात रहायला होतो. घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. चौथीपर्यंत शिक्षण मोफत असल्याने शाळेत जाता आले. त्यानंतर मात्र शाळा सुटली ती कायमचीच. त्यावेळी मी तात्यासाहेब मराठे यांच्या प्रेसमध्ये कामाला लागलो. तात्यासाहेब स्वातंत्र्यसैनिक होते. नानासाहेब गोरे, एस.एम.जोशी यांच्यासह ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. स्वातंत्र्याच्या गोष्टी त्यांच्याकडून ऐकायला मिळायच्या. त्यातूनच मी घडत गेलो, राष्ट्रप्रेमाचे संस्कार मनात रुजत गेले. तात्यासाहेबांच्या पश्चात वहिनी कमलताई मराठे यांनीही कायम प्रेमळ वागणूक दिली. बिनभिंतीच्या शाळेने मला जीवनाचे धडे दिले. आईने मातृभूमीप्रेमाचे संस्कार केले.* मुस्लिम सत्यशोधक चळवळीशी कसे जोडले गेलात?- माझ्या बहिणीचे सोळाव्या वर्षीच लग्न झाले. अठराव्या वर्षी तिच्या पतीने तिला तलाक दिला आणि दुसरे लग्न केले. बहिणीला दोन मुले होती. त्यांची जबाबदारीही बहिणीवर होती. जुनी झाली म्हणून टाकून द्यायला आणि आवडली म्हणून नवीन घ्यायला पत्नी म्हणजे भाजीपाला आहे का, असा प्रश्न मी बहिणीच्या पतीला आणि मौलवींना विचारला. बहिणीच्या तलाकचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि तिथूनच अन्यायाविरोधातील लढ्याला ख-या अर्थाने सुरुवात झाली. * हमीद दलवाई यांच्याशी कशी भेट झाली?- सर्वधर्म सलोखा जपला जावा, यासाठी आम्ही तरुणांनी राष्ट्रीय एकात्मता समितीची स्थापना केली. या माध्यमातून भाई वैद्य, बाबा आढाव, यदुनाथ थत्ते यांच्यासारख्या व्यक्तींशी संपर्क आला. युक्रांदतर्फे टिळक स्मारक मंदिर येथे हमीद दलवाई यांच्या तीनदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. मानवी मुल्यांना महत्व देणारे त्यांचे विचार मनाला पटले. तलाकविरोधातील विषय डोक्यात पक्का बसला होता. दलवार्इंना भेटण्याची इच्छा भार्इंना बोलून दाखवली. दोन दिवसांनी भार्इंच्या घरी हमीद दलवाई यांना भेटलो. त्यांचा मनमिळावू स्वभाव, साधी राहणी आणि उच्च विचार मनाला भावले. बहिणीप्रमाणे इतरांवर अन्याय होऊ नये, यासाठी काम करण्याची इच्छा त्यांना बोलून दाखवली. तू माझ्याबरोबर काम कर, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मी कधीच त्यांचा पिच्छा सोडला नाही.* मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना कशी झाली?- अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आपण संघटना का उभी करु नये, असा प्रश्न मी हमीदभार्इंना विचारला. भार्इंच्या घरी पुण्यातील मुस्लिम कार्यकर्त्यांच्या बैठका होत असत. वर्षभर चर्चा, विचारमंथन झाले. २२ मार्च १९७० रोजी आंतरभारतीच्या सभागृहामध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली. सामान्य लोकांनी खूप विरोध केला, टीका केली. या प्रवासात लढवय्ये आणि विचारवंत हमीदभाई यांचा सहवास लाभल्याने कार्याला योग्य दिशा मिळाली. १९७१ मध्ये आम्ही पहिली मुस्लिम महिला परिषद आयोजित केली. हमीदभार्इंच्या पश्चातही हा लढा सुरु ठेवण्याचा वसा घेतला.* तिहेरी तलाकविरोधातील कायदा मंजूर झाल्याने परिस्थिती सुधारेल, असे वाटते का?- कायदा आणि नियम कायमच चुकीच्या गोष्टींवर वचक बसवणारे असतात. मात्र, कायद्याप्रमाणेच समाजाची मानसिकता बदलणेही गरजेचे आहे. माणसे मनाने, विचाराने बदलली पाहिजेत. समाजाची नितिमत्ता जागृत झाली पाहिजे. समतेवर आधारित समान नागरी कायद्याची मागणी आम्ही शासनाकडे करत आहोत. महिलेला माणूस म्हणून जगण्याचा हक्क हवाच. * सामान्य लोकांवर आजही धर्माचा, धर्मगुरुंचा पगडा आहे. त्यांच्या मनात सुधारणेची बीजे कशी पेरता येतील?- धर्मगुरुंचे महत्व केवळ धर्मस्थळांपुरतेच मर्यादित असले पाहिजे. धर्मगुरुंपेक्षाही कायदे महत्वाचे आहेत. सामान्यांनी आपले जाती-धर्म घरात खुंटीला टांगून माणूस म्हणून घराबाहेर पडावे. कोणत्याही धर्मापेक्षा राष्ट्रधर्म सर्वश्रेष्ठ आहे. जातीधर्मावर माणसाची किंमत ठरवली जाऊ नये. घराबाहेर आपण कोणत्याही धर्माचे नसून, भारतीय नागरिक आहोत याचा विसर पडता कामा नये. स्वर्ग किंवा नरकासारख्या संकल्पनांचा विचार करण्यापेक्षा जमिनीवर आपल्या भवताली काय चालले आहे आणि त्यात आपण काय सुधारणा घडवू शकतो, याचा विचार प्रत्येक सुज्ञ माणसाने केला पाहिजे. 

टॅग्स :Puneपुणे