शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कळसचा हरणेश्वर अ‍ॅग्रो प्रकल्प बंदच

By admin | Updated: January 14, 2017 03:07 IST

इंदापूर तालुकयातील कळस येथील शर्कराकंदापासून इथेनॉलनिर्मिती करणारा हरणेश्वर अग्ॉ्रो हा प्रकल्प नऊ वर्षांपासून बंद आहे

कळस : इंदापूर तालुकयातील कळस येथील शर्कराकंदापासून इथेनॉलनिर्मिती करणारा हरणेश्वर अग्ॉ्रो हा प्रकल्प नऊ वर्षांपासून बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा कारखाना राजकारणाचा बळी ठरला आहे. आघाडी सरकारच्या काळात लालफितीचा फटका बसल्यामुळे डबघाईला आलेल्या या कारखान्याला युतीच्या राज्यातही अच्छे दिन आलेच नाहीत.कळस (ता. इंदापूर) येथील माळरानावर १९९९ भाजपाचे नेते बाबासाहेब चवरे यांनी आपल्या सहकार्याच्या साह्याने सुमारे २०९ एकर क्षेत्रावर या कारखान्याची भाजपा नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते पायाभरणी केली. पुढे २००५मध्ये सुरू झालेल्या या कारखान्यामधून शर्कराकंदापासून इथेनॉलनिर्मिती व उसापासून गूळ पावडरनिर्मिती करण्यास सुरवात झाली. उजनी जलाशयावरून यासाठी पाईपलाइन करून पाणीही आणण्यात आले. या ठिकाणी कामगारांसाठी वसाहतही उभी करण्यात आली. मात्र, राजकीय षड्यंत्र व प्रशासकीय उदासीनता यांमुळे उसापासून साखरनिर्मितीसाठी या कारखान्याला आघाडी सरकारच्या काळात अंतराची अट दाखवून परवाना नाकारण्यात आला. शर्कराकंदापासून इथेनॉलनिर्मिती व उसापासून गूळ पावडर, यावर कारखान्याची आर्थिक गणिते कोलमडली. त्यामुळे सुमारे १२ हजार सभासदांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी आपली जमीन शेअररूपी मोबदल्यात कारखान्याला दिली. मात्र, २००९नंतर हा प्रकल्प गेली नऊ वर्षे बंदच आहे.