शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

Maharashtra | साखर कारखान्यांची धुराडी थंडावली; राज्यातील उत्पादन १७ टक्क्यांनी घटले

By नितीन चौधरी | Updated: April 19, 2023 16:19 IST

राज्यातील सर्व २१० कारखान्यांची धुराडी आता थंडावली...

पुणे : गेल्या वर्षी साखरेचे विक्रमी १२७ लाख टन उत्पादन घेतल्यानंतर महाराष्ट्रात यंदा १०५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे देशात राज्याचा अव्वल क्रमांक घसरला असून उत्तर प्रदेशने पुन्हा उत्पादनात बाजी मारली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन १७ टक्क्यांनी घटले आहे. राज्यातील सर्व २१० कारखान्यांची धुराडी आता थंडावली आहे.

गेल्या वर्षीच्या साखर हंगामात १९९ साखर कारखाने सुरू होते. तर १२२३ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले. उसाचे उत्पादन जास्त झाल्याने राज्यातील काही भागात जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कारखाने सुरू होते. यातून १२७.५ लाख टन साखर उत्पादित झाली. यंदा राज्यात २१० सहकारी व खासगी कारखाने सुरू होते. या कारखान्यांनी १०५४ लाख टन उसाचे गाळप केले. यातून १०५.२७ लाख टन साखर उत्पादित झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन यंदा १७ टक्क्यांनी घटले आहे. तर गेल्या वर्षी १०.४२ टक्के साखर उतारा मिळाला होता. यंदा तो ९.९८ टक्क्यांवर घसरला आहे.

या हंगामात उसाचे उत्पादन घटण्यामागे सप्टेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १७५ लाख टन ऊस उत्पादन कमी झाले. त्याप्रमाणे यंदा साखर निर्यातीला केंद्र सरकारने ब्रेक लावला. गेल्या वर्षी देशातून ११० लाख टन साखर निर्यात झाली होती. त्यात राज्याचा वाटा सुमारे ७५ लाख टन इतक होता. यंदा मात्र, केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार केवळ ६० लाख टन साखर निर्यातीची परवानगी दिली होती. हा कोटा सुरुवातीच्या उत्पादनातूनच पूर्ण करण्यात आला. त्यामुळे यंदा १७ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविण्यात आली. त्याचाही परिणाम एकूण साखर उत्पादनावर झाला आहे.

याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, “सततच्या पावसामुळे ऊस लागवडीवर परिणाम होऊन उत्पादनावरही परिणाम झाला. यंदा पावसाच्या प्रमाणावर ऊस लागवड ठरणार आहे.” पुढील हंगामातही लागवड कमी होण्याचा अंदाज सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागात उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे, अशी शक्यता साखर उद्योगातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यंदा उत्तर प्रदेशात सुमारे ११५ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश आघाडीवर असेल. त्यानंतर राज्याचा क्रमांक लागतो. देशभरात आतापर्यंत एकूण ३२५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSugar factoryसाखर कारखाने