शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

साखर कारखान्यांचे गाळप आजपासून; राज्यात १०६ कारखान्यांना परवान्याचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 11:51 IST

राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार ३१ सप्टेंबर अखेरपर्यंत १०६ कारखान्यांना परवाने वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासून (दि. १) गाळप हंगामास सुरुवात होणार असून कारखान्याचे बॉयलर पेटणार आहेत. 

ठळक मुद्दे१९१ कारखान्यांचे आॅनलाईन परवान्यासाठी अर्ज, त्यातील १०६ कारखान्यांना परवाने वितरितविविध कारणांमुळे बंद अवस्थेत असलेले ५ कारखाने पुन्हा होणार सुरू

पुणे : राज्यातील साखर कारखाने सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार ३१ सप्टेंबर अखेरपर्यंत १९१ कारखान्यांनी आॅनलाईन परवान्यासाठी अर्ज केले आहेत. त्यातील १०६ कारखान्यांना परवाने वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासून (दि. १) गाळप हंगामास सुरुवात होणार असून कारखान्याचे बॉयलर पेटणार आहेत. राज्य शासनाने गळीत हंगाम सुरू करण्यासाठी साखर कारखान्यांना आॅनलाईन नोंदणी करण्याचे आदेश दिले होते. गेल्या वर्षाची किमान आधारभूत रक्कम थकविल्यामुळे (एफआरपी) १४ कारखान्यांना परवाने नाकारण्यात आले. त्यामुळे हे कारखाने बंद राहणार आहेत. कृषी आयुक्त संभाजी कडू-पाटील म्हणाले, ‘‘यंदा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या गळीत हंगामासाठी राज्यभरातून १९१ कारखान्यांनी आॅनलाइन अर्ज केले. त्यापैकी त्रुटीपूर्तता केलेल्या १०६ कारखान्यांना परवाने वितरित केले असून आणखी काही कारखान्यांना परवाने देण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या वर्षी ५ नोव्हेंबर रोजी गळीत हंगाम सुरू झाला होता. तसेच, ५० कारखाने सुरू झाले होते. मात्र, यंदा पहिल्या दिवशी १०६ कारखाने  सुरू होत आहेत.’’‘एफआरपी’नुसार पैसे न दिलेल्या कारखान्यांना यंदा गाळपाची परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच, यंदा दोन नवीन साखर कारखाने सुरू होत आहेत. तसेच, यंदा काही बंद पडलेले कारखानेही सुरू होत आहेत. 

 

बंद कारखाने पुन्हा सुरू होणारविविध कारणांमुळे बंद अवस्थेत असलेले ५ कारखाने पुन्हा सुरू होणार आहेत. त्यात बीडच्या अंबाजोगाई आणि जयभवानी साखर कारखान्याचा तसेच नगर येथील बाबा तनपुरे कारखाना, नाशिकमधील के. के. वाघ कारखाना, तर औरंगाबाद येथील घृष्णेश्वर साखर कारखाना यांचा समावेश आहे. यंदाच्या गळीत हंगामामध्ये शिरूर येथील ‘पराग अ‍ॅग्रो’ कारखाना सुरू होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीonlineऑनलाइन