शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

....परंपरेला छेद देत तो झाला सनदी लेखापाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 07:00 IST

घरातील परिस्थिती बेताची. कुटुंबाचा प्रपंच चालविण्यासाठी सुनीलचे वडील श्यामराव निंबाळकर हे गावोगावी भटकंती करीत चाळणी व पत्र्याचे डबे विकायचे....

ठळक मुद्देवैदू समाजातील सुनील निंबाळकरची यशोगाथा : ग्रामस्थांकडून सत्कार, वाजतगाजत काढली मिरवणूक 

गोरख जाधव- बारामती : गावोगावी भटकंती करीत छोटे-मोठे व्यवसाय करण्याची वैदू समाजाची परंपरा. मात्र, या परंपरेला छेद देत आणि घरातील अठराविश्वे दारिद्र्यावर मात करीत डोर्लेवाडी येथील एका युवकाने शिक्षणाची वाट धरली. कुटुंबीयांचा पाठिंबा आणि जिद्दीच्या जोरावर त्याने सनदी लेखपाल पदाला गवसणी घातली आहे. डोर्लेवाडी येथील सुनील निंबाळकर असे या युवकाचे नाव असून वैदू समाजातील तो पहिलाच लेखापाल ठरला आहे...  घरातील परिस्थिती बेताची. कुटुंबाचा प्रपंच चालविण्यासाठी सुनीलचे वडील श्यामराव निंबाळकर हे गावोगावी भटकंती करीत चाळणी व पत्र्याचे डबे विकायचे. ‘शिकणं म्हणजे निव्वळ वेळ वाया घालावणं; आता लगिन झालंय कयतरी कामाधंद्याचं बघा,’ असा सल्ला देणारे अनेक जण सुनीलच्या अवतीभवती होते. मात्र, सुनीलने कुटुंबाचा विश्वास जिंकला होता. आई-वडील आणि बायकोच्या खंबीर पाठिंब्यावर त्याने शिक्षणाची कास सोडली नाही. तोकड्या कमाईत श्यामराव यांनी सुनीलच्या शिक्षणाचा खर्च भागवला. तर, समाजिक चालिरीतींमुळे २०१६मध्ये सुनील याचाही वयाच्या २३व्या वर्षी विवाह उरकला. एकीकडे सांसारिक जबाबदारी पडली, तरीही उच्च शिक्षित होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या सुनीलने शिक्षण सोडले नाही. संसाराची जबाबदारी पडल्याने ‘आता शिकून काय करणार? कामाधंद्याचे पाहा,’ असा फुकटचा सल्ला देणारेही कमी नव्हते. मात्र, कुटुंबाचा असणारा भरभक्कम पाठिंबा सुनीलचे बळ वाढवत गेला. पुण्यात उच्च शिक्षणासाठी असताना त्याने केंद्रीय लोकसेवा आयोग इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले होते. प्रचंड मेहनत घेत सुनील सनदी लेखापाल झाला. आपला मुलगा नेमकं काय शिकला, याची माहितीही नसलेले आई-वडील मात्र सुनीलच्या यशावर खूष आहेत. ‘त्याला जे पाहिजे होतं ते त्याला मिळालं, ह्योच आमचापण आनंद,’ असं त्याचे वडील म्हणतात. ........................आई-वडिलांचा अभिमान...घरची परिस्थिती अतिशय बेताची; परंतु संकटावर मात करीत त्याने बीकॉमची पदवी घेतली. निरंतर अभ्यास करून सनदी लेखपालपदी मजल मारली. या यशाबद्दल सुनीलच्या आई-वडिलांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून डोर्लेवाडी ग्रामपंचायतीने सुनीलचा जाहीर सत्कार केला. समाजातील पहिलाच मुलगा उच्चशिक्षित झाल्याने समाजातील नागरिकांनी  सुनीलची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढून त्याचे कौतुक केले. 

टॅग्स :Baramatiबारामती