शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

अखेर रसवंती आंदोलनाला यश; जय महेशचे प्रशासन नमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:26 IST

ऊस बीलाची रक्कम मिळण्यासाठी जय महेश साखर कारखाना पवारवाडी (जि.बीड) आणि सावरगाव, तेलगाव येथील कारखाना प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पुण्यातील साखर संकुलासमोर शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या 'रसवंती आंदोलना'ला मोठे यश आले आहे.

पुणे : ऊस बीलाची रक्कम मिळण्यासाठी जय महेश साखर कारखाना पवारवाडी (जि.बीड) आणि सावरगाव, तेलगाव येथील कारखाना प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पुण्यातील साखर संकुलासमोर शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या 'रसवंती आंदोलना'ला मोठे यश आले आहे. साखर आयुक्त आणि जय महेश कारखान्याचे जनरल मॅनेजर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बीले आजपासून जमा होणार आहेत. येत्या 31 जानेवारी पर्यंत 15 डिसेंबरपर्यंत गाळप झालेल्या ऊसाची बीले थकित रक्कम देण्यात येणार असल्याची लेखी हमी जय महेश कारखान्याने सोमवार रोजी दिली. शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा आमदार डॉ.निलम गोऱ्हे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संचालक ज्ञानदेव मुकणे, मंगेश तिटकारे यांच्याशी सविस्तर चर्चा करुन योग्य शिष्टाई केली आणि पिडीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. शिवसेना माजलगाव तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन गेली सात दिवस चालले. त्यामुळे या आंदोलनाला 100%यश मिळाले असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे. पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर गेले सात दिवस दिनांक 15 जानेवारी पासून माजलगाव मतदारसंघातील पवारवाडी, सावरगाव आणि तेलगाव येथील तीन साखर कारखाना प्रशासनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुण्यातील साखर संकुलासमोर रसवंती थाटून हे अभिनव आंदोलन केले. या आंदोलनाला मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता संबंधित प्रशासन खडबडून जागे झाले आणि शिवसेना माजलगाव तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यासह शेतकऱ्यांना साखर आयुक्त कार्यालयात चर्चेसाठी बोलावले. या चर्चेनंतर सोमवारी पिडीत शेतकरी, शिवसेना पदाधिकारी व साखर आयुक्त यांच्यात समाधानकारक चर्चा होवून योग्य तोडगा निघाला.या आंदोलनाची दखल घेत तीन दिवसांपूर्वीच छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव(जि.बीड) आणि लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव(जि.बीड) या दोन्ही कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या डिसेंबर अखेरपर्यंत गाळप झालेल्या ऊसाची बीले देण्याबाबत तात्काळ निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर देखिल टाकले. मात्र जय महेश साखर कारखान्याने अडेलतट्टूपणाची भूमिका घेतल्यामुळे हे आंदोलन सोमवारपर्यंत सुरुच होते. मात्र अखेर साखर आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा आमदार डॉ.निलम गोऱ्हे यांनी योग्य शिष्टाई करुन शेतकऱ्यांच्या वतीने आपली प्रभावी बाजू मांडली. साखर आयुक्त, साखर संचालक मंगेश तिटकारे, ज्ञानदेव मुकणे आणि आंदोलक यांच्यात झालेल्या शिष्टाईनंतर जय महेश साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीष लोखंडे यांनी या प्रश्नी अधिकृत पत्र दिले आहे. जय महेश साखर कारखाना प्रशासनाच्या वतीने गिरीष लोखंडे यांनी दिलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, येत्या दिनांक 31 जानेवारीपर्यंत दिनांक 15 डिसेंबर 2018 पर्यंत गाळप झालेली शेतकऱ्यांची थकीत ऊसाची बीले देण्यात येतील अशी हमी दिली आहे.साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी योग्य शिष्टाई केल्याबद्दल त्यांचे शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा आमदार डॉ.निलम गोऱ्हे, अप्पासाहेब जाधव, अॅड.दत्ता रांजवण यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा संघटक रामदास ढगे, वडवणी तालुकाप्रमुख संदीप माने, मुंजाबा जाधव, आकाश खामकर, संदिप ढिसले, तिर्थराज पांचाळ, शिवाजी सावंत, माऊली शेंद्रे, सुखदेव धुमाळ, अनिल धुमाळ, ओंकार जाधव, विक्रम सोळंके, नामदेव सोजे, गणेश शिंदे, मुक्तीराम कापसे, मोंकीद बरबडे, गोविंद शेळके, कृष्णा कोळपे हे शेतकरी व शिवसैनिक सहभागी झाले होते. त्यांनी साखर आयुक्त व जय महेश साखर कारखान्याने दिलेल्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 

अखेर शिवसेनेच्या लढ्याला यश - आप्पासाहेब जाधवपिडीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण यापुढेही कार्यरत राहणार आहे. शेतकऱ्यांना त्यांची थकीत ऊस बीले मिळत आहेत याचे मला समाधान वाटते. सध्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असले तरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सदैव रस्त्यावर उतरु असा इशारा जाधव यांनी दिला आहे आणि शेतकरी व शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत तीनही साखर कारखान्याच्या प्रशासनाने दखल घेवून ऊस बीले देण्याबाबत निर्देश द्यावे लागले हे आंदोलनाचे फलित असून शिवसेनेच्या लढ्याचे अखेर यश आले आहे.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखाने