शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
3
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
4
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
5
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
6
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
7
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
8
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
9
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
10
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
11
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
12
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
13
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
14
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
15
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
16
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
17
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
18
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
19
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
20
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार

विद्यार्थ्यांची गळती रोखण्यात यश

By admin | Updated: August 13, 2016 05:17 IST

कृतियुक्त ज्ञानरचनावादाचे धडे व आयएसओ शाळा या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शाळांचा दर्जा वाढला असून, या वर्षी पुणे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी गळती रोखण्यात

पुणे : कृतियुक्त ज्ञानरचनावादाचे धडे व आयएसओ शाळा या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शाळांचा दर्जा वाढला असून, या वर्षी पुणे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी गळती रोखण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. ५५६ इतका पट वाढविण्यात आला असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद व उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे व शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यात जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थीसंख्या वाढणारी पुणे जिल्हा परिषद ही पहिलीच असल्याचा दावाही या वेळी त्यांनी केला. आज झालेल्या स्थायी समिती बैैठकीत पटसंख्या वाढल्याने उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण व अर्थ समिती आणि शिक्षण विभागाचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आलेला आहे. जिल्हा परिषद शाळांमधील गळती रोखणे हे आमचे स्वप्न होते. ज्या वेळी ही गळती रोखू तेव्हाच आमची कारकीर्द यशस्वी होईल, असे वक्तव्य कंद व वांजळे यांनी वारंवार केले होते. गेल्या वर्षी २९0 वर आलेली गळती या वर्षी शून्य होईल, असा ठाम विश्वास त्यांना होता. मात्र, जूनअखेरपर्यंत ‘लोकमत’च्या हाती लागलेल्या आकडेवारीवरून पुन्हा २ हजार ९१७ ने विद्यार्थी गळती वाढल्याचे समोर आले होते. मात्र ३0 जुलैअखेरपर्र्यत मिळालेल्या आकडेवारीवरून ५५६ ने पट वाढल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक शिरूर तालुक्यात १ हजार १0२ व हवेली तालुक्यात १ हजार ४६ इतका पट वाढला आहे. त्याखालोखाल मुळशी ६२२, खेड ३८९ व पुरंदरला ५४ इतके विद्यार्थी वाढले आहेत. मात्र, बारामती ८४३, जुन्नर ५५३, इंदापूर ४0९, वेल्हा २५५, आंबेगाव १९१, मावळ १२१ इतकी मोठी विद्यार्थी गळती येथे कायम आहे. २0१२-१३ या वर्षांत जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या २ लाख ४६ हजार ७६५ इतकी होती. २0१३-१४ मध्ये ती २ लाख ३९ हजार ५३0 इतकी होऊन ७ हजार २३५ इतकी विद्यार्थी गळती झाली होती. त्यानंतर २0१४-१५ मध्ये ३ लाख ३४ हजार ५६0 इतकी होऊन गळती ४ हजार ९३४ पर्यंत आली होती. गेल्या वर्षी २0१५-१६ मध्ये यात लक्षणीय बदल होऊन पटसंख्या रोखून धरण्यात यश आले होते. फक्त ३२६ इतकी गळती झाली होती. ती प्लसमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू होते. याला यश आले असून, गेल्या वर्षी २ लाख ३४ हजार २७0 इतका असलेला पट या वर्षी ३0 जुलैपर्यंत २ लाख ३४ हजार ८२६ इतका झाला असून, पहिल्यांदाच पट ५५६ ने वाढला आहे. शाळा सुरू होण्याच्या सुरुवातीलाच शिक्षण विभागाने विद्यार्थी पालकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले होते. त्यात ‘गुढीपाडवा व पट वाढवा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम होता. पटसंख्या नोंदीचा जिल्हा परिषदेने सप्ताह राबवून घरोघरी जाऊन तुमच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्या, असे सांगितले होते. विशेष म्हणजे या वेळी जिल्हा परिषद शाळा भौतिक सुधारणांबरोबर आयएसओ दर्जाच्या होत असून, ई-लर्निंग, कृतियुक्त अध्ययन पद्धती, संगणकीकृत शाळा आदी विविध उपक्रम सुरू आहेत. (प्रतिनिधी)शिक्षकांना स्वयंप्रेरणेने कामाचे स्वातंत्र्यप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम प्रभावीपणे राबविला गेला. शिक्षकांना वारंवार प्रशिक्षण देण्यात आले. ज्ञानरचनावादाचे धडे देण्याबरोबरच शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने काम करण्याचे स्वातंत्र्य दिले गेले. त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवली. शाळेतील प्रत्येक मूल शिकेल, यावर भर देण्यात येत आहे. सेमी इंग्रजीच्या शाळा सुरू केल्या. तसेच केलेले काम पालकांपर्यंत पोहोचवून जिल्हा परिषद शाळांत आपला पाल्य का शिकला पाहिजे, हे घरोघरी जाऊन पटवून दिल्याने या वर्षी विद्यार्थिसंख्या वाढल्याचे हवेलीच्या गटशिक्षण अधिकारी ज्योती परिहार यांनी सांगितले.हा आमच्यासाठी व जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसाठी आनंदाचा दिवस आहे. सतत पटसंख्या कमी होण्याची प्रथा मोडण्यात यश आले आहे. आमच्या शिक्षकांनी चांगले काम करून जनतेचा विश्वास मिळवल्याने पट वाढविण्यात यश मिळाले. पालकांनी आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेत दाखल करावे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आम्ही देतो.- प्रदीप कंद, अध्यक्ष, जिल्हा परिषदमाझं स्वप्न पूर्ण झालं. दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी सभापतिपदाचा पदभार घेतला, त्या वेळी विद्यार्थी गळती हे रोखणे हे माझे मोठे आव्हान होते. शाळांचा भौतिक दर्जा सुधारण्याबरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर आमचा भर होता. तसेच ज्ञानरचनावादाचे धडे देण्याबरोबर खासगी शाळांच्या दर्जाचे शिक्षण जिल्हा परिषद शाळांतही मिळू शकते, हा विश्वास आमचे शिक्षक पालकांमध्ये निर्माण करू शकल्याने हे यश मिळाले.- शुक्राचार्य वांजळे, उपाध्यक्ष (शिक्षण समिती सभापती)गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या जोरावर शिरूर तालुक्यातील इंग्रजी माध्यमातील ८३७ मुलं जिल्हा परिषद शाळांमध्ये घेऊन येण्यास आम्ही यशस्वी झालो असून महामार्गावर औद्यागिक पट्ट्यातील कामगारांची मुलंही जिल्हा परिषदेतील शाळेत दाखल झाल्याने या वर्षी पटसंख्या वाढण्यात आम्हाला यश मिळाले आहे़- अर्जुन मिसाळ, गटशिक्षण अधिकारी, शिरूर