शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची गळती रोखण्यात यश

By admin | Updated: August 13, 2016 05:17 IST

कृतियुक्त ज्ञानरचनावादाचे धडे व आयएसओ शाळा या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शाळांचा दर्जा वाढला असून, या वर्षी पुणे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी गळती रोखण्यात

पुणे : कृतियुक्त ज्ञानरचनावादाचे धडे व आयएसओ शाळा या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शाळांचा दर्जा वाढला असून, या वर्षी पुणे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी गळती रोखण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. ५५६ इतका पट वाढविण्यात आला असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद व उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे व शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यात जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थीसंख्या वाढणारी पुणे जिल्हा परिषद ही पहिलीच असल्याचा दावाही या वेळी त्यांनी केला. आज झालेल्या स्थायी समिती बैैठकीत पटसंख्या वाढल्याने उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण व अर्थ समिती आणि शिक्षण विभागाचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आलेला आहे. जिल्हा परिषद शाळांमधील गळती रोखणे हे आमचे स्वप्न होते. ज्या वेळी ही गळती रोखू तेव्हाच आमची कारकीर्द यशस्वी होईल, असे वक्तव्य कंद व वांजळे यांनी वारंवार केले होते. गेल्या वर्षी २९0 वर आलेली गळती या वर्षी शून्य होईल, असा ठाम विश्वास त्यांना होता. मात्र, जूनअखेरपर्यंत ‘लोकमत’च्या हाती लागलेल्या आकडेवारीवरून पुन्हा २ हजार ९१७ ने विद्यार्थी गळती वाढल्याचे समोर आले होते. मात्र ३0 जुलैअखेरपर्र्यत मिळालेल्या आकडेवारीवरून ५५६ ने पट वाढल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक शिरूर तालुक्यात १ हजार १0२ व हवेली तालुक्यात १ हजार ४६ इतका पट वाढला आहे. त्याखालोखाल मुळशी ६२२, खेड ३८९ व पुरंदरला ५४ इतके विद्यार्थी वाढले आहेत. मात्र, बारामती ८४३, जुन्नर ५५३, इंदापूर ४0९, वेल्हा २५५, आंबेगाव १९१, मावळ १२१ इतकी मोठी विद्यार्थी गळती येथे कायम आहे. २0१२-१३ या वर्षांत जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या २ लाख ४६ हजार ७६५ इतकी होती. २0१३-१४ मध्ये ती २ लाख ३९ हजार ५३0 इतकी होऊन ७ हजार २३५ इतकी विद्यार्थी गळती झाली होती. त्यानंतर २0१४-१५ मध्ये ३ लाख ३४ हजार ५६0 इतकी होऊन गळती ४ हजार ९३४ पर्यंत आली होती. गेल्या वर्षी २0१५-१६ मध्ये यात लक्षणीय बदल होऊन पटसंख्या रोखून धरण्यात यश आले होते. फक्त ३२६ इतकी गळती झाली होती. ती प्लसमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू होते. याला यश आले असून, गेल्या वर्षी २ लाख ३४ हजार २७0 इतका असलेला पट या वर्षी ३0 जुलैपर्यंत २ लाख ३४ हजार ८२६ इतका झाला असून, पहिल्यांदाच पट ५५६ ने वाढला आहे. शाळा सुरू होण्याच्या सुरुवातीलाच शिक्षण विभागाने विद्यार्थी पालकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले होते. त्यात ‘गुढीपाडवा व पट वाढवा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम होता. पटसंख्या नोंदीचा जिल्हा परिषदेने सप्ताह राबवून घरोघरी जाऊन तुमच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्या, असे सांगितले होते. विशेष म्हणजे या वेळी जिल्हा परिषद शाळा भौतिक सुधारणांबरोबर आयएसओ दर्जाच्या होत असून, ई-लर्निंग, कृतियुक्त अध्ययन पद्धती, संगणकीकृत शाळा आदी विविध उपक्रम सुरू आहेत. (प्रतिनिधी)शिक्षकांना स्वयंप्रेरणेने कामाचे स्वातंत्र्यप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम प्रभावीपणे राबविला गेला. शिक्षकांना वारंवार प्रशिक्षण देण्यात आले. ज्ञानरचनावादाचे धडे देण्याबरोबरच शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने काम करण्याचे स्वातंत्र्य दिले गेले. त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवली. शाळेतील प्रत्येक मूल शिकेल, यावर भर देण्यात येत आहे. सेमी इंग्रजीच्या शाळा सुरू केल्या. तसेच केलेले काम पालकांपर्यंत पोहोचवून जिल्हा परिषद शाळांत आपला पाल्य का शिकला पाहिजे, हे घरोघरी जाऊन पटवून दिल्याने या वर्षी विद्यार्थिसंख्या वाढल्याचे हवेलीच्या गटशिक्षण अधिकारी ज्योती परिहार यांनी सांगितले.हा आमच्यासाठी व जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसाठी आनंदाचा दिवस आहे. सतत पटसंख्या कमी होण्याची प्रथा मोडण्यात यश आले आहे. आमच्या शिक्षकांनी चांगले काम करून जनतेचा विश्वास मिळवल्याने पट वाढविण्यात यश मिळाले. पालकांनी आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेत दाखल करावे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आम्ही देतो.- प्रदीप कंद, अध्यक्ष, जिल्हा परिषदमाझं स्वप्न पूर्ण झालं. दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी सभापतिपदाचा पदभार घेतला, त्या वेळी विद्यार्थी गळती हे रोखणे हे माझे मोठे आव्हान होते. शाळांचा भौतिक दर्जा सुधारण्याबरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर आमचा भर होता. तसेच ज्ञानरचनावादाचे धडे देण्याबरोबर खासगी शाळांच्या दर्जाचे शिक्षण जिल्हा परिषद शाळांतही मिळू शकते, हा विश्वास आमचे शिक्षक पालकांमध्ये निर्माण करू शकल्याने हे यश मिळाले.- शुक्राचार्य वांजळे, उपाध्यक्ष (शिक्षण समिती सभापती)गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या जोरावर शिरूर तालुक्यातील इंग्रजी माध्यमातील ८३७ मुलं जिल्हा परिषद शाळांमध्ये घेऊन येण्यास आम्ही यशस्वी झालो असून महामार्गावर औद्यागिक पट्ट्यातील कामगारांची मुलंही जिल्हा परिषदेतील शाळेत दाखल झाल्याने या वर्षी पटसंख्या वाढण्यात आम्हाला यश मिळाले आहे़- अर्जुन मिसाळ, गटशिक्षण अधिकारी, शिरूर