शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही :राज्य मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 20:07 IST

पुणे : बीड येथील गटसाधन केंद्रात दहावी व बारावीच्या परीक्षेतील १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या आहेत, त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही असे राज्य मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्दे बीड येथील गटसाधन केंद्रात दहावी व बारावीच्या परीक्षेतील १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याया परिस्थितीमध्ये मंडळाकडून निश्चित करण्यात आलेल्या गोपनीय पध्दतीने विद्यार्थ्यांना त्या विषयाचे गुण दिले जाणार आहेत

दहावी-बारावी उत्तरपत्रिका जळीत प्रकरणपुणे : बीड येथील गटसाधन केंद्रात दहावी व बारावीच्या परीक्षेतील १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या आहेत, त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही असे राज्य मंडळाच्या अध्यक्ष शंकुतला काळे यांनी स्पष्ट केले आहे. या परिस्थितीमध्ये मंडळाकडून निश्चित करण्यात आलेल्या गोपनीय पध्दतीने विद्यार्थ्यांना त्या विषयाचे गुण दिले जाणार आहेत, तरी त्यांनी निश्चिंत होऊन पुढील पेपर द्यावेत असे आवाहन काळे यांनी केले आहे.   शनिवारी बारावीचा गणिताचा तर दहावीचा द्वितीय भाषा उर्दू आणि होकेशनल या विषयांचे पेपर झाले. त्याच्या विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिका गट साधन केंद्रात ठेवण्यात आल्या होत्या. रविवारी सायंकाळी अचानक याठिकाणी आग लागून बारावीच्या ११९९ तर दहावीच्या २२१ उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. याप्रकरणाची गंभीर दखल राज्य मंडळाकडून घेण्यात आली आहे.  याठिकाणी जाणीवपूर्वक आग लावून उत्तरपत्रिका जाळण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर उत्तरपत्रिका सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तींच्या लक्षात हा प्रकार कसा आला नाही याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापार्श्वभुमीवर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून या मागच्या कारणांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. त्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढे काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय राज्य मंडळाकडून घेतला जाईल, असे शंकुतला काळे यांनी सांगितले. परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे हित जपण्याला सध्या प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बीडमधील वसंत महाविद्यालय (केज), सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय (केज), रामराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय (केज), पुरुषोत्तमदादा सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय सारणी (आनंदगाव), काळेगाव कनिष्ठ महाविद्यालय काळेगाव घाट, श्याम कनिष्ठ महाविद्यालय दहिफळ (वडमाऊली), युसूफवडगाव कनिष्ठ महाविद्यालय, युसूफवडगाव, जीवन प्रगती कनिष्ठ महाविद्यालय, (नांदूरघाट) आदी परीक्षा केंद्रांमधील बारावी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. दहावीतील विद्यार्थ्यांच्या केंद्रांची निश्चित माहिती समजू शकलेली नाही. 

टॅग्स :PuneपुणेBeedबीडVinod Tawdeविनोद तावडेStudentविद्यार्थी