शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही :राज्य मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 20:07 IST

पुणे : बीड येथील गटसाधन केंद्रात दहावी व बारावीच्या परीक्षेतील १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या आहेत, त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही असे राज्य मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्दे बीड येथील गटसाधन केंद्रात दहावी व बारावीच्या परीक्षेतील १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याया परिस्थितीमध्ये मंडळाकडून निश्चित करण्यात आलेल्या गोपनीय पध्दतीने विद्यार्थ्यांना त्या विषयाचे गुण दिले जाणार आहेत

दहावी-बारावी उत्तरपत्रिका जळीत प्रकरणपुणे : बीड येथील गटसाधन केंद्रात दहावी व बारावीच्या परीक्षेतील १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या आहेत, त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही असे राज्य मंडळाच्या अध्यक्ष शंकुतला काळे यांनी स्पष्ट केले आहे. या परिस्थितीमध्ये मंडळाकडून निश्चित करण्यात आलेल्या गोपनीय पध्दतीने विद्यार्थ्यांना त्या विषयाचे गुण दिले जाणार आहेत, तरी त्यांनी निश्चिंत होऊन पुढील पेपर द्यावेत असे आवाहन काळे यांनी केले आहे.   शनिवारी बारावीचा गणिताचा तर दहावीचा द्वितीय भाषा उर्दू आणि होकेशनल या विषयांचे पेपर झाले. त्याच्या विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिका गट साधन केंद्रात ठेवण्यात आल्या होत्या. रविवारी सायंकाळी अचानक याठिकाणी आग लागून बारावीच्या ११९९ तर दहावीच्या २२१ उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. याप्रकरणाची गंभीर दखल राज्य मंडळाकडून घेण्यात आली आहे.  याठिकाणी जाणीवपूर्वक आग लावून उत्तरपत्रिका जाळण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर उत्तरपत्रिका सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तींच्या लक्षात हा प्रकार कसा आला नाही याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापार्श्वभुमीवर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून या मागच्या कारणांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. त्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढे काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय राज्य मंडळाकडून घेतला जाईल, असे शंकुतला काळे यांनी सांगितले. परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे हित जपण्याला सध्या प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बीडमधील वसंत महाविद्यालय (केज), सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय (केज), रामराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय (केज), पुरुषोत्तमदादा सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय सारणी (आनंदगाव), काळेगाव कनिष्ठ महाविद्यालय काळेगाव घाट, श्याम कनिष्ठ महाविद्यालय दहिफळ (वडमाऊली), युसूफवडगाव कनिष्ठ महाविद्यालय, युसूफवडगाव, जीवन प्रगती कनिष्ठ महाविद्यालय, (नांदूरघाट) आदी परीक्षा केंद्रांमधील बारावी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. दहावीतील विद्यार्थ्यांच्या केंद्रांची निश्चित माहिती समजू शकलेली नाही. 

टॅग्स :PuneपुणेBeedबीडVinod Tawdeविनोद तावडेStudentविद्यार्थी