शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

विद्यार्थ्यांनी गुणांनुसार पर्याय निवडावेत - डॉ. जगदीश चिंचोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:01 IST

आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचा फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्याला मिळालेले गुण लक्षात घ्यावेत व त्यानुसार पर्याय निवडावेत, असा सल्ला मॉडर्न महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य डॉ. जगदीश चिंचोरे यांनी दिला. अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेसंबंधी त्यांच्याशी साधलेला संवाद...

दहावीची परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वेध लागतात ते अकरावीच्या प्रवेशाचे. आता तर आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेमुळे सगळ्याच गोष्टी सहजसोप्या झाल्या असल्या, तरी पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासंंबंधीची चिंता सतावत असते. आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचा फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्याला मिळालेले गुण लक्षात घ्यावेत व त्यानुसार पर्याय निवडावेत, असा सल्ला मॉडर्न महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य डॉ. जगदीश चिंचोरे यांनी दिला. अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेसंबंधी त्यांच्याशी साधलेला संवाद...दहावीचा निकाल, निकालानंतर अकरावीच्या प्रवेशाची चिंता यामुळे पालक आणि पाल्य यांना अनेक प्रश्न पडलेले दिसून येतात. साधारणपणे अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी आॅनलाईन अर्ज करताना सर्वप्रथम आपल्याला मिळालेले गुण लक्षात घ्यावेत. त्यानुसार आपल्यासमोर उपलब्ध पर्यायांची निवड करावी. गुणांना केंद्रबिंदू मानावे. याचे मुख्य कारण असे, की सगळ्याच विद्यार्थ्यांना शहरातील प्रसिद्ध महाविद्यालयांमध्ये प्रवेश हवा असतो. मात्र, प्रत्यक्षात ते गुणवत्ता यादीनुसार शक्य नसते. अशा वेळी विद्यार्थ्यांनी टाकलेल्या पर्यायांमधून त्यांच्या गुणांनुसार महाविद्यालय उपलब्ध होते. दुसरा मुद्दा म्हणजे, ज्या महाविद्यालयाला पसंतीक्रम देत आहोत, त्याचा मागील वर्षीचा कट आॅफ तपासावा. जेणेकरून, विद्यार्थ्यांना चालू काळातील गुणवत्ता यादीचे भान येईल. जातिनिहाय मिळणाऱ्या प्रवेशप्रक्रियेमध्ये याचा संदर्भ घेणे महत्त्वाचे ठरते. गुणांनुसार प्रवेशाची माहिती घेतल्यास वेळेची व पैशांची बचत तर होतेच; शिवाय पालक आणि विद्यार्थ्यांना होणारा मनस्तापदेखील कमी होण्यास मदत होते. यामुळे आॅनलाईन फॉर्म बारकाईने आणि काळजीपूर्वक भरावा. त्याबद्दल काही शंका असल्यास संंबंधित महाविद्यालयाशी दूरध्वनी क्रमाकांवर संपर्क साधावा. यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची झाल्यास घरापासून महाविद्यालयाचे अंतर. हे अंतर सोयीचे आहे किंवा नाही, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. बºयाचदा विद्यार्थी घाईने अथवा चुकीने पर्यायाची निवड करतात. मात्र, उशिरा त्यांना लक्षात येते, की आपण निवडलेला पर्याय महागात पडणार आहे. अशा वेळी पुन्हा मग दुसºया फेरीदरम्यान त्यांना बदल करावे लागतात.या चुका होऊ नयेत, यासाठीच सुरुवातीच्या काळात महाविद्यालयाचे घरापासूनचे अंतर, पोहोचण्यास लागणारा वेळ या गोष्टी प्राधान्यक्रमाने लक्षात घ्याव्यात. ज्या महाविद्यालयाची निवड विद्यार्थी करीत आहे, त्या महाविद्यालयात कुठले विषय शिकविले जातात, याची माहिती घ्यावी. अनेकदा अमुक एखाद्या विद्यार्थ्याला जर्मन, गणित, जीवशास्त्र विषयांना पर्याय निवडायचे असतात. मात्र, त्या महाविद्यालयात हे विषय शिकविले जात नसतील, तर विद्यार्थ्यांना निराशेला सामोरे जावे लागते. याविषयी संबंधित महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर सर्व माहिती नमूद केली जाते ती विद्यार्थी व पालक यांनी वाचणे महत्त्वाचे आहे. तसेच, आपण कुठल्या गटातून प्रवेश घेत आहोत? उदा.- खेळाडू, अपंग किंवा स्वातंत्र्यसैनिकांचा नातू यांपैकी कुठल्याही एका प्रकारातून विद्यार्थी अर्ज करणार असतील, तर आवश्यक त्या कागदपत्रांची माहिती विद्यार्थ्यांनी घेणे जरुरीचे आहे.कागदपत्रांची माहिती वेळीच न घेतल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेवर झालेला दिसून येतो. याशिवाय, आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेत अनुदानित, विनाअनुदानित असे दोन पर्याय नमूद केलेले असून त्याची अभ्यासपूर्ण माहिती विद्यार्थी व पालकांनी घ्यायला हवी. अनेकदा विद्यार्थ्यांकडून विनाअनुदानित गटातून प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज केला जातो. प्रत्यक्षात ज्या वेळी प्रवेश शुल्क भरण्याची वेळ येते, तेव्हा मात्र पालक नाराजी व्यक्त करू लागतात. एकूणच आॅनलाईनच्या प्रवेशप्रक्रियेत नकारात्मक असे काही नसून ते पालकांच्या सोयीकरिता आहे. आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला खात्रीने प्रवेश तर मिळतोच; मात्र तो प्रवेश जास्त डोकेदुखीचा विषय न होता सहजसोपा व्हावा, याकरिता विद्यार्थी व पालक या दोघांनी काळजी घ्यायला हवी.

टॅग्स :Studentविद्यार्थीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या