शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

विद्यार्थी शाळेत अन् शिक्षक भागवत सप्ताहात, पालकांचा संताप अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 00:21 IST

गोसावीवाडी (ता. इंदापूर) येथील दोन शिक्षकी शाळेत बुधवारी शिक्षकांनीच दांडी मारल्याने मुलांना शिक्षकाविना शाळेचा अनुभव आला.

कळस : गोसावीवाडी (ता. इंदापूर) येथील दोन शिक्षकी शाळेत बुधवारी शिक्षकांनीच दांडी मारल्याने मुलांना शिक्षकाविना शाळेचा अनुभव आला. कहर म्हणजे एक शिक्षक कुठलीही कल्पना न देता गैरहजर होता, तर दुसरा मात्र सकाळी शाळा उघडून गावाकडे भागवत सप्ताहाला गेला. त्यामुळे आज दिवसभर शाळेला कोणी वालीच राहिला नाही आणि मुलांनी दिवसभर वर्गातच दंगा घालण्याचा आनंद घेतला. ही घटना मुलांनी घरी सांगितल्यवर मात्र ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.इंदापुर तालुक्यातील कळस केंद्रातील गोसावीवाडी शाळेत २१ मुले शिक्षण घेत आहेत. याठिकाणी दोन शिक्षक कार्यरत आहेत मात्र सोमवार पासुन एक शिक्षक शाळेकडे फिरकलाच नाही एक शिक्षक सकाळी येवुन येथील वर्ग खोल्यांचे कुलप उघडून थोडावेळ गावातील भागवत सप्ताहाला निघुन गेले. दुपारी तीन वाजेपर्यंत शिक्षकांविना विध्यार्थी शाळेत बसुन होते. ग्रामस्थांना याची माहिती मिळताच त्यांनी शाळेकडे धाव घेतली. संबंधित शिक्षकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे त्यानंतर शिक्षकांनी सायंकाळी ग्रामस्थांची माफी मागितली.लोकसहभागातून शाळेचे रूप पालटले आहे. तसेच विविध सुविधा पुरविल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागत असतानाच शिक्षकच असे कुठलीही कल्पन न देता गैरहजर राहिल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून काय आदर्श घ्यायचा, असा सवालही यावेळी पालकांनी उपस्थित केला.शाळेमध्ये आज दुपारी तीन वाजेपर्यंत एकही शिक्षक दिसले नाहीत, मुलांना विचारले असता त्यांनी गुरुजी येऊन गेल्याचे सांगितले आम्ही पाच ते सहा ग्रामस्थांनी शाळेत येऊन पाहणी केली असता हा प्रकारउघडकीस आला-अंबादास गावडे, ग्रामस्थआज घडलेला प्रकार खरा आहे. त्यांनी झालेल्या चुकीबद्दल ग्रामस्थांसमोर माफी मागितली आहे. मात्र, शिक्षकांच्या अशा कृत्यामुळे शाळेची गुणवत्ता ढासळली आहे.- कैलास गावडे, शाळा समिती अध्यक्ष

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र