शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

शांततेच्या मार्गाने आंदाेलन करण्याचे शिक्षण विद्यापीठांमधून देणे गरजेचे : राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 16:33 IST

विदयार्थ्यांना शांततेच्या मार्गाने आंदाेलन करण्याचे शिक्षण विद्यापीठांमधून दिले गेले पाहिजे असे मत राज्यपालांनी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमात व्यक्त केले.

पुणे : सार्वजनिक संपत्तीचे नुकसान हाेऊ न देता शांततेच्या मार्गाने आंदाेलन हाेणे गरजेचे आहे. असे शिक्षण विद्यार्थ्यांना विद्यापीठांमधून देणे गरजेचे आहे असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी व्यक्त केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र यांच्यातर्फे आयाेजित 9 व्या राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बाेलत हाेते.  

यावेळी पुण्याचे महापाैर मुरलीधर माेहळ, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डाॅ. विश्वनाथ कराड, संगणक तज्ञ डाॅ. विजय भटकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड उपस्थित हाेते. 

आम्हाला माेकळेपणाने बाेलू द्या..विद्यार्थ्यांची राज्यपालांकडे मागणी 

काेश्यारी म्हणाले, “जेव्हा आम्ही एकमेकांची गोष्ट मान्य करू, तेव्हाच या विश्‍वात शांतता निर्माण होईल  फिट इंडियासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज समाजातील मत भिन्नतेमुळे शांती निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना असे शिक्षण देणे गरजेचे आहे, की ज्यामुळे सरकारी संपत्तीचे नुकसान होणार नाही. विश्‍व शांतीसाठी सर्वप्रथम आत्मज्ञान होणे गरजेचे आहे. समाज एकत्रित आणण्यासाठी या देशात गणेशोत्सवाची सुरूवात झाली होती. पण, आज याची स्थिती वेगळी झाली आहे. या वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने जे नऊरत्न शोधले त्यामुळे नक्कीच येथील विद्यार्थी हा नवरत्नसारखा बनेल. लिबरल त्यांना म्हणतो जो सर्वांना सोबत घेऊन जवळ करतो. पीस केव्हा येईल जेव्हा आम्ही एकदुसर्‍यांची गोष्ट मान्य करू. वेळेनुसार काही मापदंड ठेवणे गरजेचे आहे. दुसर्‍यांचा आदर कराण्याची शिक्षा विद्यार्थ्यांना मिळावी. ”

टॅग्स :Puneपुणेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीmitएमआयटी