शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
2
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
3
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
4
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
5
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
6
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
7
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
8
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
9
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
10
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
11
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
12
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
13
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
14
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
15
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
16
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
17
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
18
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
19
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
20
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार

‘अकरावी’साठी विद्यार्थी झाले ‘सैराट’

By admin | Updated: July 29, 2016 04:03 IST

‘मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू... अ‍ॅडमिशन द्या.’ अशी मागणी अकरावीत प्रवेश न मिळाल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी केली असून, काही विद्यार्थ्यांनी

पुणे : ‘मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू... अ‍ॅडमिशन द्या.’ अशी मागणी अकरावीत प्रवेश न मिळाल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी केली असून, काही विद्यार्थ्यांनी उपोषणदेखील सुरू केले आहे. एरवी गांधीगिरीद्वारे आंदोलने केली जातात; मात्र आता ‘सैराट’ पद्धतीने आंदोलने करण्यात येऊ लागली आहेत.पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व अकरावी केंद्रीय नियंत्रण समितीतर्फे गुरुवारी १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश आॅनलाइन पद्धतीने निश्चित करण्यात आले. तरीही शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. विद्यार्थी व पालक दररोज शिक्षण उपसंचालक कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र, आता विद्यार्थ्यांचा संयमाचा बांध फुटला आहे. त्यामुळे चांगले गुण मिळूनही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी उपोषण सुरू केले. अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे शिक्षण विभागातर्फे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र, या वेळापत्रकानुसार प्रवेश मिळण्यासाठी आॅक्टोबर महिनाअखेरीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. परंतु, कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीचे वर्ग सुरू होऊन एक आठवडा उलटला आहे. तरीही कनिष्ठ महाविद्यालायात प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाची भावना आहे.गुणवत्ता असूनही केवळ पसंतिक्रम चुकल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. परंतु, शिक्षण विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप करत विद्यार्थ्यांनी हेच का अच्छे दिन? असा सवाल उपस्थित केला. त्याचप्रमाणे १५-१६ वर्षांच्या वयात विद्यार्थ्यांवर प्रवेश मिळविण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. ही शिक्षण विभागासाठी भूषणावह गोष्ट नाही. त्यामुळे प्रवेशाचा प्रश्न तत्काळ सोडवून विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर आॅफलाइन पद्धतीने संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. विद्यार्थ्यांनी उपोषण सोडावे म्हणूनमहापौर प्रशांत जगताप यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. तसेच शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर व सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत यांच्याशी चर्चा केली.अकरावी प्रवेशातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. सध्या पालकांच्या मागणीनुसार सर्वांना एकदम प्रवेशाची संधी दिल्यास विद्यार्थी आणि पालकांना केवळ अर्ज भरण्याचे समाधान मिळेल. परंतु, पाचव्या फेरीनंतर कॉलेजांमध्ये रिक्त राहणाऱ्या नेमक्या जागांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यास त्यांना योग्य ठिकाणी प्रवेश मिळू शकेल. विद्यार्थी व पालकांनी संयम ठेवावा आणि आॅनलाइन प्रक्रियेला सहकार्य करावे. - विनोद तावडे, शिक्षणमंत्रीवयाच्या १५-१६व्या वर्षी विद्यार्थ्यांना उपोषण करण्याची वेळ येते. हे दुर्दैवी असून विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न तत्काळ सोडवावा. त्यासाठी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधावा. महाविद्यालयांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत.- प्रशांत जगताप, महापौर