शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांच्या समर्थकांची व्यूहरचना, शिरूर लोकसभेसाठी १०० अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 16:23 IST

प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीसाठी किमान पाच उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत...

चाकण (पुणे) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकांनी आता सरकारला कोंडीत पकडण्यासाठी नवी योजना आखली आहे. त्यानुसार प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीसाठी किमान पाच उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. अशीच तयारी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघामधून करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी खेड- आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सकल मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीमध्ये सरकारने आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ शिरूर लोकसभा मतदारसंघामधून १०० हून अधिक उमेदवारी अर्ज भरण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्याप्रमाणे अनेकांनी नाव नोंदणी केली आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन त्या पूर्ण केल्या नाहीत. मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून सरकारने न मागितलेले दहा टक्के आरक्षण समाजाला देऊ केले आहे. याबाबत पुढील भूमिका ठरवण्यासाठी मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली अंतरवाली सराटीत बैठक होणार आहे. या बैठकीला खेड-आळंदी परिसरातून जास्तीत जास्त समाजबांधवांनी जाण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड- आळंदी विधानसभेतील शंभर उमेदवार आपले उमेदवारी अर्ज येणाऱ्या लोकसभेला भरणार असल्याचे अंकुश राक्षे यांनी सांगितले.

 

 

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकShirurशिरुर