शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांच्या समर्थकांची व्यूहरचना, शिरूर लोकसभेसाठी १०० अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 16:23 IST

प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीसाठी किमान पाच उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत...

चाकण (पुणे) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकांनी आता सरकारला कोंडीत पकडण्यासाठी नवी योजना आखली आहे. त्यानुसार प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीसाठी किमान पाच उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. अशीच तयारी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघामधून करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी खेड- आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सकल मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीमध्ये सरकारने आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ शिरूर लोकसभा मतदारसंघामधून १०० हून अधिक उमेदवारी अर्ज भरण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्याप्रमाणे अनेकांनी नाव नोंदणी केली आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन त्या पूर्ण केल्या नाहीत. मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून सरकारने न मागितलेले दहा टक्के आरक्षण समाजाला देऊ केले आहे. याबाबत पुढील भूमिका ठरवण्यासाठी मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली अंतरवाली सराटीत बैठक होणार आहे. या बैठकीला खेड-आळंदी परिसरातून जास्तीत जास्त समाजबांधवांनी जाण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड- आळंदी विधानसभेतील शंभर उमेदवार आपले उमेदवारी अर्ज येणाऱ्या लोकसभेला भरणार असल्याचे अंकुश राक्षे यांनी सांगितले.

 

 

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकShirurशिरुर