शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

राज्य साखर संघाकडून ऊस उत्पादक शेतक-यांच्या ताटात माती कालविण्याचा उद्योग; माजी खासदार राजु शेट्टी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 09:33 IST

वर्षांपूर्वी दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेमध्ये म्हणने मागण्यास मुदत मागितल्याने उच्च न्यायालयाने पुढील आठवड्यात मंगळवारी सुनावणी

बारामती - एक रक्कमी एफ. आर. पी कायम करण्याच्या उच्च न्यायालयातील याचिकेवरील निर्णय अंतिम असताना आज राज्य साखर संघाने दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेवर मुदत मागून राज्य साखर संघाकडून ऊस उत्पादक शेतक-यांच्या ताटात माती कालविण्याचा उद्योग केला आहे,अशी टीका माजी खासदार राजु शेट्टी यांनीकेली आहे.शेट्टी यांनी याबाबत व्हीडीओ प्रसारीत करीत माहिती दिली.शेट्टी म्हणाले, एक रक्कमी एफ. आर. पी च्या कायद्यात बेकायदेशीर बदल केल्याप्रकरणी राज्य सरकारच्या अनागोंदी कारभारावर मा.उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आज या याचिकेवर निकाल लागण्याची शक्यता होती. मात्र राज्य साखर संघाने तीन वर्षांपूर्वी दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेमध्ये म्हणने मागण्यास मुदत मागितल्याने उच्च न्यायालयाने पुढील आठवड्यात मंगळवारी सुनावणी ठेवली.वास्तविक पाहता राज्य साखर संघाकडून तीन वर्षांपूर्वी हस्तक्षेप याचिका दाखल केल्यानंतर वेळोवेळी झालेल्या सुनावणी दरम्यान आपली बाजू मांडणे गरजेचे होते. मात्र गेल्या तीन वर्षात राज्य साखर संघाकडून कोणताही पदाधिकारी , अधिकारी ,वकील अथवा कर्मचारी यांनी सुनावणीस ऊपस्थित राहण्यास जाणीवपुर्वक टाळले.आज उच्च न्यायालयात न्यायालय निर्णय देत असताना गेल्या अनेक दिवसांपासून झोपेत असणार्या साखर संघाला जाग आली.साखर संघाने एकरकमी एफआरपी शेतकर्यांना मिळु नये,यासाठी हे पाऊल टाकल्याची टीका शेट्टी यांनी केली.

राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या ऊसातून वर्षाला पाच -पाच कोटी रूपयाची वर्गणी गोळा करून राज्य साखर संघाने कारखानदारीच्या हितासाठी आजपर्यंत कोणतेच पाऊल उचलले नाही. राज्यातील सहकारी साखर कारखाने कवडीमोल दराने विकले जात असताना त्याचा कधी चौकशी अहवाल तयार केला नाही , साखर कारखान्याकडून होत असलेल्या भरमसाठ खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी कधी ऊपाययोजना राबविण्यात आली नाही , दोन कारखान्यांच्या मधील अंतराचे अट घालून त्याच साखर कारखान्यांना दुप्पट तिप्पट गाळप क्षमता वाढवून देत असताना साखर संघ मुग गिळून गप्प होते , राज्यातील ऊस वाहतूकदार मुकादमांच्या फसवणुकीत संकटात सापडला असताना त्या प्रश्नात कधी लक्ष घालावासे वाटले नाही, राज्यातील साखर कारखान्यांचा कधीही कॅास्ट ॲाडिट करावे असे वाटले नाही.मात्र शेतक-यांच्या बाजूने निकाल लागणार हे लक्षात आल्यानंतर आज हस्तक्षेप याचिकेवर म्हणने सादर करण्यास वेळ मागून उस उत्पादक शेतक-यांच्या ताटात माती कालविण्याचे काम सुरू केले आहे.शेतकर्याच्या एकरकमी एफआरपीचा निर्णय होइपर्यंत लढत राहणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsugarcaneऊस