शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राज्य लोकसेवा आयोगाच्या खुल्या जागांसाठी शुल्काचा अडसर नाही, व्ही.एन.मोरे      

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 21:02 IST

मागासवर्गीय संवर्गातील जागांसाठी अर्ज करणा-या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा खुल्या संवर्गातील जागांसाठी सुध्दा विचार केला जाईल. शुल्क हा जागांसाठी अडसर समजला जाणार नाही,असे एमपीएससीचे अध्यक्ष व्ही.एन.मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले

ठळक मुद्देसंबंधित विद्यार्थ्यांकडून खुल्या संवर्गातील शुल्क आकारले जात होते. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. परंतु, त्यांनी गोंधळून जावू नये असे आवाहन

पुणे: राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) सामान्य प्रशासन, गृह विभाग व वित्त विभागाच्या रिक्त जागांसाठी आॅनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांच्या मनात शुल्क विषयक शंका निर्माण झाल्या आहेत. मात्र, मागासवर्गीय संवर्गातील जागांसाठी अर्ज करणा-या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा खुल्या संवर्गातील जागांसाठी सुध्दा विचार केला जाईल. शुल्क हा जागांसाठी अडसर समजला जाणार नाही,असे एमपीएससीचे अध्यक्ष व्ही.एन.मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. एमपीएससीकडून विविध पदांसाठी आॅनलाईन अर्ज भरताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या संवर्गातील जागांचा लाभ हवा असेल तर तशी विचारणा केली जात होती.त्याचप्रमाणे संबंधित विद्यार्थ्यांकडून खुल्या संवर्गातील शुल्क आकारले जात होते. एमपीएससीतर्फे २८ फेब्रुवारी रोजी गृहविभागाच्या ३८७, वित्त विभागाच्या ३४ आणि सामान्य प्रशासन विभागाच्या २७ जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली.या पदांसाठी अर्ज भरताना विद्यार्थ्यांना खुल्या संवर्गातील जागांचा लाभ हाव आहे किंवा नाही? याबाबत विचारणा केली जात नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. परंतु, विद्यार्थ्यांनी गोंधळून जावू नये,असे आवाहन व्ही.एन.मोरे यांनी केले आहे.मोरे म्हणाले, राज्य लोकसेवा आयोगाकडून जुन्या नियमानुसार विद्यार्थ्यांना शुल्क भरताना विचारना केली जात होती.परंतु,आयोगाने २० डिसेंबर २०१७ रोजी यासंदर्भात निर्णय घेतला होता. त्यानुसार खुल्या किंवा मागासर्वगीय जागांसाठी आता शुल्क हा अडसर राहिला नाही. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी निश्चित करण्यात आलेले शुल्क भरले तरी हे विद्यार्थी खुल्या संवर्गातील जागांसाठी पात्र ठरतील.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थी