शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

राज्य सरकारचे जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष- दिलीप वळसे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 2:52 AM

वैद्यकीय अधिकारी, परिचारिका पदे भरण्याची आवश्यकता असून सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केला

टाकळी हाजी : राज्य सरकार जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत गंभीर नाही. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका पदे भरण्याची आवश्यकता असून सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केला.पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने कवठे येमाई (ता. शिरूर ) येथे मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले होते. शिबीराचे उद्घाटन आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते, झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपट गावडे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,कृषी सभापती सुजाता पवार, सभापती विश्वास कोहकडे, माजी सभापती सुभाष उमाप, जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे, सविता बगाटे, स्वाती पाचुंदकर, राजेंद्र जगदाळे, कुसुम मांढरे, उपसभापती मोनिका हरगुडे, प्रकाश पवार, मानसिंग पाचुदकर, राजेंद्व गावडे, रंगनाथ थोरात, वर्षा शिवले, गटविकास अधिकारी संदीप जठार, उप अभियंता महेंद्र कोठारी, अरुणा घोडे, प्रदीप वळसे पाटील, सविता पºहाड, तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शिंदे, डॉ चंद्रकांत ढगे, सरपंच दिपक रत्नपारखी, सुदाम ई चके, बाळासाहेब डांगे आदी उपस्थित होते.यावेळी वळसे पाटील म्हणाले की, ‘‘ग्रामिण भागातील महिलांच्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असुन, वैदयकीय सेवा वेळेत मिळत नसल्याने अनेक रूग्ण दगावतात. ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाबरोबरच आरोग्याला महत्व दिले पाहीजे.पुणे जिल्हा परिषदेने शाळा, महाविद्यालयामधील मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबीनची तपासणी करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी. ’’ आरोग्य शिबीरात ५ हजार ३६५ रूग्णांनी तपासणी करुन घेतली. डॉ.चंद्रकांत ढगे यांनी चष्मे वाटप केले. १२८ लोकांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. संचालक राजेंद्र गावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :BJPभाजपाGovernmentसरकार